गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. दररोज चार महिला अत्याचाराला बळी पडत आहेत. मंत्र्यांचे कारनामे बाहेर येत आहेत. हवी तशी सत्ता राबवून सत्तेचा बट्ट्याबोळ, सत्त्यानाश सुरु आहे. गृहमंत्री कोण आहेत. हे खाते चालवतय कोण हेच समजत नाही. अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पोलीस दलातील बदल्यांमध्ये मोठा घोळ आहे. कशी बदली केली, का केली, निकष काय लावले या मागील सत्य जनतेला समजण्यासाठी गृह विभागाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.
ते म्हणाले, पूजा चव्हाण, रेणू शर्मा प्रकरणात मंत्री अडकले आहेत. मंत्र्याचा जावई ड्रगमध्ये अडकतो, एक पोलीस अधिकारी स्फोटक ठेवतो, त्याच्या गाडीत रोख रकमेसह नोटा मोजण्याचे मशीन सापडते. पीपीई किट घालनू तोच गाडी चालवतो. या सर्व घटनांची जबाबदारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आहे. केवळ पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांनी समाधान होणार नाही. देशमुखय यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी जोरदार मागणी करीत हे सर्व प्रकरण चालवणाऱयांनी समोर यावे, असे आव्हानही त्यांनी केले आहे.
वाझे लादेन आहे की त्याचा बाप आहे लवकरच कळेल
पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांसाठी गैरमार्गाने सत्ता वापरली जात आहे. असा अरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. ते म्हणाले, वास्तवीक अधिवेशन मराठा आरक्षण, ओबीसींचे कमी झालेले राजकिय आरक्षण यावर चालणे अपेक्षित होते. गेल्या 16 महिन्यात सरकार सहजासहजी कोणतीही गोष्ट मान्य करायला तयार नसते. मात्र शेवटी अडचणी वाढल्यानंतर विरोधी पक्षाची मागणी नाईलाजास्तव मान खाली घालावी लागली. अंबानी यांच्या घरासमोर लावली गाडी प्रकरणात सचिन वाझे दोषी आहेत हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना सरकारचे जावई असल्यासारखे वागणूक दिली. प्रकरण अंगलट येणार हे लक्षात आल्यानंतर सचिन वाझे यांचा पदभार काढून घेतला.
वाझे लादेन आहे की त्याचा बाप लवकरच कळेल अशा तिखट शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. वाझेच्या मागे मोठी राजकीय शक्ती आहे. आता मुंबईचे आयुक्त परमिंदरसिंग यांना संरक्षण दिले. इतका वेळ लागतो का निर्णय करायला. सुबोध जयस्मलानी यांनी केद्रात परत जाण्यासाठी पत्र लिहले. एका अधिकाऱयाने बदलीसाठी पैसे नाहीत म्हणून लांब अंतरावर त्याची बदली केली. असा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत यांना मुख्यमंत्री, गृहमंत्री करा
राज्याचा गृहमंत्री कोण हेच जनतेला कळेना झालयं. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतच या खात्यावर अधिक बोलत आहेत. वाझेला त्यांनीच प्रशिस्तीपत्र दिले. त्यांचा या खात्याविषयी काहीही संबध येत नाही. तरीही ते बोलत असतील तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांनाच गृहमंत्री करुन धाडशी निर्णय घ्यावा अशी खोचक टिका त्यांनी केली.
तोंडात पाणी जाऊ लागले की आईसुद्धा पिलाला पायाखाली घेते
सरकारची आई कोण आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सरकार पडेल असे आम्ही कधीही म्हटलो नाही. पण आलिकडच्या घटना पहाता पाणी गळÎापर्यंत आले आहे. तोंडात पाणी चालले की आईसुद्धा डोक्यावरील पिलांचा विचार करत नाही. त्यालाही पायाखाली घेऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. असे सूचक विधान करुन सरकार फारकाळ टिकणार नाही. असे अप्रत्यरित्या सांगण्याचा प्रयत्न चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.