जागतिक तुलनेत भारताचे स्पीड कमीच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना कालावधीपासून सर्वाधिक लोक घरातून काम करण्याचा पर्याय निवडून घरातून काम करत असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु यावेळी दुसरीकडे सरकारची नजर इंटरनेट स्पीडवर राहिलेली आहे. सध्याच्या स्थितीवरुन अर्थव्यवस्था, शिक्षणासह अन्य सर्वच प्रकारची कामे घर बसल्या करण्यावर भर दिला जात आहे. यामध्येच सरकार स्लो इंटरनेट स्पीडच्या बाबतीत काळजीत असल्याची माहिती आहे.
मागील चार पाच वर्षात भारतामध्ये इंटरनेट स्पीडमध्ये वेग निर्माण केला आहे. हा वेग प्राप्त केला असला तरीही जागतिक पातळीवरील वेगाच्या तुलनेत खुपच कमी असल्याचे समोर आले आहे. मोबाईल ब्रॉडबँड आणि फिक्स ब्रॉडबँडसाठी ग्लोबल ऍव्हरेज डाऊनलोड स्पीड 34.67 एमबीपीएस आणि 78.26 एमबीपीएस आहे. भारतात मात्र हा आकडा 12.16 एमबीपीएस आणि 38 एमबीपीएस आहे. यामुळे मोबाईल ब्रॉडबँडमधील जागतिक पातळीवरील स्पीडच्या तुलनेत एकतृतीवंश आणि फिक्स ब्रॉडबँडच्या बरोबरीत निम्मे आहे.
ध्येय निश्चित
कमी वेगाच्या इंटरनेट स्पीडच्या समस्येमुळे आगामी काळात देशातील सदरचे स्पीड हे 50 एमबीपीएस इतके करण्याचा विचार असून ते ध्येय लवकरच प्राप्त करणार असल्याचे टेलिकॉम रेग्युलेटर अधिनियम प्राधिकरण यांच्याकडून सांगण्यात आले आहे. हा मुद्दा 50 एमबीपीएस इंटरनेट स्पीडसंदर्भातील नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलीसी 2018 मध्येही याचा समावेश करण्यात आला आहे.