ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने आज शनिवारी नवीन कोविड – 19 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाश्याला रेल्वेच्या परिसरात विना मास्क असेल आणि थुंकल्यास आता दंडही होऊ शकतो.
आता जर एखादा प्रवासी रेल्वेच्या आवारात थुंकताना आढळून आला अथवा तोंडावर मास्क घातला नसेल तर त्याला 500 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर मास्क नसेल तर जाता येणार नाही. हा आदेश पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठी जारी असणार आहे, असे अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, प्रवाश्याला भारतीय रेल्वे तसेच रेल्वे परिसरातील स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. रेल्वेच्या 2012 च्या कायद्यानुसार हा दंड आकारला जाईल.