प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने शेतकऱयांच्या बांधावर जाऊन जो शब्द दिला तो वचनभंग करण्याच काम केले आहे. या सरकारने बनवाबनवी करून कोकणातील शेतकऱयांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसल्याचा आरोप भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सरकारने जाहीर केलेली मदत कोकणातील शेतकऱयांच्या दृष्टीने अतिशय तुटपुंजी आहे. आता येथील शेतकऱयांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, कोकणासाठी वेगळे पॅकेज जाहीर करा, शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात उतरला तर भाजपा त्याच्या मागे उभा राहिल, असा इशारा दरेकर यांनी दिला.
रत्नागिरीत परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. या झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी दरेकर हे शनिवारी रत्नागिरी दौऱयावर होते. शेती नुकसानीच्या पाहणीसाठी त्यांनी येथील चांदेराई, निवळी, चिंचखरी, पोमेंडी या भागाला भेटी दिल्या. त्या भेटीनंतर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारच्या शेतकरी अनास्थेवर जोरदार टीका पेली. यावेळी सरकारने जाहीर केलेल्या नुकसानीच्या पॅकेजवर भाष्य करताना त्यांनी कोकणात गुंठय़ांवर शेती केली जाते. हेक्टर मदतीचा उपयोग कोकणातील शेतकऱयांना होणार नाही. सरकारने कोकणासाठी स्वतंत्र निकष तयार करून विशेष पॅकेज जाहीर करावे, अशीच मागणी केली.
शेतकऱयांची क्रूर चेष्टाच
ठाकरे सरकारने 10 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले असले तरी साडेपाच हजार कोटींच प्रत्यक्षात मिळणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. शासन निकषानुसार हेक्टरी 10 हजार रुपये मदत देताना 2 हेक्टरची मर्यादा आहे. कोकणातील शेतकरी गुठय़ात आहेत. त्यांना फक्त 100 रुपये मिळतील. ही अपुरी मदत आहे. कोकणातील शेतकऱयांना वाया गेलेले पिक उचलायला 300-400 रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे मिळणारी भरपाई त्यात खर्च होईल. ही एक प्रकारे कोकणातील शेतकऱयांची क्रूर चेष्टाच असल्याची खंत दरेकर यांनी व्यक्त केली.
ठाकरे सरकारने शेतकऱयांचे वचनभंग करण्याचे काम केलेय. या सरकारने बनवाबनवी करून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. आज महाविकास आघाडी सरकारमध्ये सेनेला जी सत्तास्थाने मिळाली, त्यात कोकणातील जनतेचा मोठा वाटा आहे. त्यामुळे येथील शेतकऱयाला वेगळे पॅकेज मिळायला हवे होते. पण शिवसेनेने कोकणाकडे दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, उमेश कुलकर्णी, मुन्ना चवंडे आदी उपस्थित होते.