ऑनलाईन टीम / तरुण भारत
दोन ते अडीच वर्षे कोरोनामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन कोरोना संसर्ग कमी आल्यावर काहीसं पुर्वस्थितीत येते आहे. ठाकरे सरकारने देखील कोरोना फैलाव कमी मंदावल्याच्या निमित्ताने नागरिक समुदायाने एकत्र येतील अशा कार्यक्रमांवर निर्बंध घातले होते. मात्र ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे घेत नागरीकांना सण साजरे करण्यासाठीच्या असणाऱ्या मर्यादा कमी केल्या आहेत.
राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.