रत्नागिरी /प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पूरस्थितीमुळे शेकडो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामध्ये ना भांडी राहिली नाही कपडे तर काहींचे संसार चिखलमय झाले. या चिपळूणवासीयांना नव्याने उभारी देण्यासाठी रत्नागिरीतील शेकडो संस्था, दानशूर व्यक्ती पुढे आल्या आहेत. तर दुसरीकडे थेट ठाण्यातून नवीन कपडे घेऊन एक टेम्पो सोमवारी चिपळूणला रवाना झाला आहे.
ठाण्यातील तरुण उद्योजक आणि श्रीजी मोबाईल टेलिकॉम चे मालक बापूजी यांच्यामार्फत ही मदत पाठवण्यात आली आहे.
सोशल मीडियावर चिपळूणच्या पूरस्थितीबाबत माहिती मिळताच बापूजी यांनी क्षणाचाही विलंब न लावता सर्व नवीन कपड्यांची खरेदी करून त्याचे नीट पॅकिंग करून चिपळूण कडे रवाना केले आहे आणखीन काही मदत ते पाठवणार असून महत्वाचे म्हणजे त्यांनी रुग्णांसाठी २ ऑक्सीजन concentrator ही पाठवले आहे. श्रीजी मोबाईल टेलिकॉम चे बापूजी यांच्या या सामाजिक बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.