प्रतिनिधी/ सातारा
नागरिकांनी ओढय़ात कचरा टाकू नये म्हणून सातारा पालिकेच्या तात्कालिन सभापती रवींद्र झुटींग यांच्या संकल्पनेनुसार शहरात ओढय़ावर जाळय़ा बसवण्यात येवू लागल्या. पुढे हेच काम पालिकेच्या इतरही नगरसेवकांनी आपल्या आपल्या प्रभागात सुरु केले आहे. मात्र, ठेकेदाराकडून हे काम करताना झाडांमध्येही जाळय़ा मारण्याचा प्रकार दिसून आला आहे. त्याबाबत वृक्ष प्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरात स्वच्छतेच्या अनुषंगाने नवनवीन संकल्पना तात्कालिन आरोग्य सभापती रवींद्र झुटींग यांनी राबवण्यात आल्या. त्याच संकल्पना आता प्रत्येक वार्डातल्या ओढय़ावर जाळया लावण्याचा प्रकार दिसून येत आहे. दस्तुरखुद्द एका पदाधिकाऱयांच्या वॉर्डातील ओढय़ावर जाळी लावताना ही जाळी चक्क झाडातच मारली गेली आहे. त्यामुळे झाडाला जीव नाही काय?, एका बाजूला खिळेमुक्त झाड अभियान शहरात राबवण्यात येते अन् दुसऱया बाजूला शहरातल्या झाडांना खिळेयुक्त झाड अशी योजना ठेकेदारांच्या मर्जीने सुरु आहे. त्याबाबत नाराजीचा सुर उमटत आहे.