ऑनलाईन टीम / सांगली :
विट्याचे तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अखेर 15 दिवसानंतर पोलिसांनी अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा, या कारणावरून झालेल्या वादातून चंद्रहार पाटील आणि त्याचा साथीदार सागर सुरवसे याने 3 मे रोजी तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केली होती. त्यानंतर दोघेही फरार होते. अखेर 15 दिवसानंतर सांगलीच्या स्थानिक क्राईम ब्रँच आणि विटा पोलिसांनी आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातून चंद्रहार आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
चंद्रहारला अटक करावी, यासाठी जिल्ह्यातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन देखील केले होते. त्यानंतर पोलिसांनी चंद्रहारच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. ही पथके मागील 15 दिवस चंद्रहारच्या मागावर होती.