प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ परिसरात डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली होती. वर्षाच्या कालावधीनंतर रस्त्यांची दुरूस्ती करण्यास मुहूर्त मिळाला. मात्र हे रस्ते काही दिवसातच खचले असल्याचे निदर्शनास आले असून, निकृ÷ दर्जाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अनगोळ परिसरात ड्रनेज वाहिन्या घालण्यात आल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. विशेषत: मारूती गल्ली परिसरातील रस्ता खूपच खराब झाला होता. वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागला. मागील वर्षी पावसाळय़ाच्या तेंडावरच ड्रेनेज वाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होती. तसेच पावसामुळे काम पूर्ण करण्यास अडथळे निर्माण झाले होते. परिणामी वाहनधारकांना आणि पादचाऱयांना ये-जा करणे मुश्किल बनले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर खोदण्यात आलेल्या चरी बुजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. वर्षाच्या कालावधीनंतर डांबरीकरणास मुहूर्त मिळालेल्या रस्ते काही दिवसातच खचू लागले आहेत.
अनगोळ परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. याचदरम्यान मारूतीगल्ली येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पण डांबरीकरण केलेल्या कांही दिवसातच हा रस्ता खचला आहे. रविवारी या मार्गावरून अवजड वाहन गेले असता ड्रनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आलेले चर खचली आहे. त्यामुळे सदर काम निकृ÷ दर्जाचे झाले असल्याचे चव्हाटय़ावर आले आहे. वर्षाच्या कालावधीनंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने कामाचा दर्जा व्यवस्थित राखणे गरजेचे होते. पण पाणी पुरवठा मंडळ आणि महापालिकेच्या अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे हे काम जुजबी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. डेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजवून नंतर डांबरीकरण करण्याची गरज होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने हा रस्ता खचला असल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत आहेत.