वडूथ ते सातारारोड रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे काम पाडले बंद
प्रतिनिधी/ गोडोली
येथील वडूथ ते सातारारोड येथील रस्त्याचे कामकाज बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. पण हे कामकाज अत्त्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे येथील नागरिकांना दिसून येताच वडूथ येथील नागरिकांनी ते काम बंद पाडले. डांबर न टाकताच फक्त खडी टाकून रस्तांचे काम उरकणाऱया ठेकेदाराचे पितळ उघडे पाडले.बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दात मोबाईल बंद केले. ‘डांबर कम खडी जादा’ असा नाही तर रस्त्याचे काम करावयाचे असल्यास योग्य गुनवत्ता आणि दर्जाचे करावे, अशी मागणी वडूथकरांनी यावेळी केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन निकम, विकास साबळे, प्रकाश साबळे आदी उपस्थित होते.
या रस्त्यावर कॉन्स्ट्रक्टरतर्फे खडी टाकण्यात आली आहे. पण खडी टाकण्यापुर्वी रस्त्यावर डांबर टाकणे ही गरजेचे असते. पण येथे केवळ खडीच टाकण्यात आली आहे. अशा प्रकारचे करण्यात येत असलेले हे निकृष्ट दर्जाचे काम येत्या पावसाळय़ात कसे टिकणार अशी विचारणा येथील नागरिकांकडुन करण्यात येत आहे. कॉन्टॅक्टरची यामध्ये चूक नसुन सर्वस्वी बांधकाम विभागास याकरीता जबाबदार असून याविरोधात प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा मदन साबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन निकम यांनी दिला.
तसेच सध्या करण्यात येत असलेले हे काम पाहता पहिल्या पावसातच या रस्त्याचा दर्जा खालावेल. याबाबत बांधकाम विभागाचे अधिकाऱयांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. तसेच मुख्य अधिकारी मुनगट्टीवार यांनी तर लेखी स्वरूपातील अर्ज द्या, अशी सल्ला दिला. कामकाजाचा दर्जा बददल सब कुछ जाणता है,अशा असणाऱया बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांनी लेखी अर्जाची मागणी करण्यात येत असुन याची स्थानिकांनी संताप व्यक्त केली.या कामाकडे या विभागाचा एक ही अधिकारी एकवेळ ही †िफरकत नाही, बांधकाम विभागा विरोधात आंदालन करण्याचा इशारा वडूथकरांनी दिला आहे.
यावेळी ठेकेदार राजेशिर्के याला बांधकाम विभागाचे सुपरवायझर सोमनाथ चव्हाण यांनी निकृष्ठ काम पाहून ते बंद करण्याचा आदेश दिला.यावेळी ठेकेदार राजेशिर्के यांनी काम बंद करणार नाही,अशी काम बंद करणारी खूप पाहिली आहेत,असे वडूथकरांना आवाहन दिले.यावरुन गावकऱयांनी निकृष्ट काम करुच देणार नाही ,असा निर्धार देत उलट आवाहन दिल्याने आता रस्त्यावरुन ठेकेदार आणि ग्रामस्थ गुरुवारी आमने सामने येण्याची शक्यता वाढली आहे.
निकृष्ट रस्ता की गेली नोकरी
देशात सर्वाधिक खर्च होऊन ही कधीच पक्के रस्ते टिकत नाहीत.टक्केवारीसाठी s अधिकारी कधीच ठेकेदारला बोलत नाहीत.उलट त्याचीं वकिली करताना दिसतात.यापुढे रस्ताचे काम निकृष्ट झाले की अधिकाऱयाला दोषी ठरवून नोकरी गेली पाहिजे. कामाच्या गुणवत्ता, दर्जा राखण्याची जबाबदारी असताना ही अध्कारी फिल्डवर येत नाहीत.त्यामुळे निकृष्ट काम होत राहणार.सध्याचा रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यासाठी आणि अधिकारी,ठेकेदारवर कारवाईसाठी कायदेशीर दाद मागणार असल्याचे मदन साबळे यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले.