जोरदार पावसामुळे सर्व कामकाज मंद. नद्यांमधील पाण्यची पातळी वाढली. पुरस्थिती मात्र नियंत्रणात. पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका कायम. सरकारी आपत्कालीन यंत्रणा सतर्क.
डिचोली/प्रतिनिधी
जोरदार पावसाने रविवारी दिवसभर डिचोली तालुक्मयाला झोडपून काढले. दोन वसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्मयातील पातळी घटलेल्या सर्व नद्या दुथडय़ा भरल्या आहेत. त्यामुळे दिवसभरातील पावसानंतर तालुक्मयातील अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोसळणारा पाऊस आणि राज्यात जारी करण्यात आलेला रेड अलर्ट पाहता रात्रभर जोरदार पाऊस झाल्यास सोमवारी (दि. 19) सकाळी बऱयाचशा भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वत्र पडलेल्या जोरदार पावसानंतर डिचोली तालुक्मयात अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. डिचोली व साखळीतील नद्यांमधील पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पंपींगद्वारे पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांमधील पाण्याची पातळी उतरली होती. गेल्या दोन दिवसांत तर नद्यांमधील पाण्याची पातळी सारखीच खालावली होती. शनि. दि. 17 जुलै रोजी काही प्रमाणात पाऊस झाला. पण काल रविवारी सकाळीपासूनच पावसाने जोर धरला.
दिवसभर अविश्रांत पडलेल्या जोरदार पावसामुळे संध्याकाळच्या वेळी तालुक्मयातील सर्वच नद्यांमधील पाण्याची पातळी वाढली होती. डिचोली नदीतील पाण्याची पातळी 3.20 मीटर इतकी होती. तर साखळीतील वाळवंटी नदीची पातळी 2.40 मीटर इतकी होती. साखळी बाजारातील नाल्यात साचणाऱया पाण्याची पातळीही 2.40 इतकीच होता. नाल्यातील पाण्याची पातळी 2.80 मीटर ओलांडू लागल्यावर नाल्यातील पाणी बाहेर फेकण्यास पंपींग सुरू केले जाते. रात्री सदर नाल्यातील पाण्याची पातळी 2.40 मीटर पर्यंत असल्याने पंप सुरू करण्यात आले नव्हते.
महाराष्ट्रातील तिळारी धरणाची पातळी काल रविवारी 107 मीटर इतकी होती. तर दिवसभर पडलेल्या पावसामुळे या धरणातील पाण्याची पातळी अधिक वाढली असणारच. या धरणाची संपूर्ण पाणी पातळी 113 मीटर इतकी आहे. हे धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर या धरणातील पाणी सोडण्यात येते. सदर पाण्याचा साठा मोठा असल्याने डिचोली तालुक्मयातील साळ व इतर गावांमध्ये पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे साळ गावावर शासकीय पातळीवरून लक्ष ठेवण्यात येत आहे.
तिळारी प्रमाणेच केरी सत्तरीतील अंजुणे धरणातील पाण्याची पातळीही वाढत आहे. या धरणाची पूर्ण क्षमता 93.20 मीटर इतकी आहे. काल रविवारपर्यंत या धरणात 87 मीटरच्या जवळ पाणी पातळी आली होती. या धरणातील पाण्याची पातळी 90 मीटर्सच्या जवळ पोहोचल्यावर या धरणातील पाण्याचा पावसाचा अंदाज पाहून समोरील नदीमध्ये विसर्ग सुरू केला जातो. सध्या पावसाचा जोर पाहता येणाऱया अवघ्याच दिवसांमध्ये धरणातील पातळी 90 मीटर पर्यंत पोहोचण्याची शक्मयता आहे. त्यानंतर मुहूर्त करून धरणातील पाणी समोरील नदीत सोडण्याची प्रक्रीया सुरू केली जाणार आहे.
रविवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे सध्या सर्वत्र परिसर जलमय झालेला आहे. नदीकिनारी भागात पाणी साचून राहिल्याने पुरसदृष्य स्थिती पहायला मिळत आहे. तालुक्मयातील सर्व नद्या सध्या काठोकाठ भरून वाहत आहेत. त्यामुळे रविवारी रात्रभर पावसाचा जोर कायमच राहिल्यास पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. या परिस्थितीवर डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित तसेच जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता के. पी. नाईक लक्ष ठेऊन आहे. पावसाचा जोर व वाढणाऱया पाण्याचा अंदाज घेऊन सरकारी आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सतर्क करण्यात आली आहेत. शनिवारी रात्री सुरू झालेला जोरदार पाऊस रविवारी दिवसभर जोरदारपणे व अविश्रांत चालूच राहिल्याने शहर बाजार परिसर दुपारनंतर सुना सुना होता. सकाळच्या वेळी पाऊस असतानाही लोकांनी मासे आणि इतर सामान खरेदीसाठी फेरफटका मारला होता. मात्र रविवार सुट्टीचा दिवस असल्याने व पाऊसही सुरूच असल्याने लोकांनी दुपारनंतर घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे संध्याकाळी तर शहर बाजारात शुकशुकाट दिसून येत होता.