नवी दिल्ली
आगामी काळात तंत्रज्ञान बाजार आणि डिजिटल अर्थव्यवस्था व्यापारी क्षेत्रात बदल आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे. याच्या मदतीने 5 हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारणीचे ध्येय साध्य करणे शक्मय होणार असल्याचेही म्हटले आहे.
राष्ट्रीय उत्पादन परिषदेच्या(एनपीसी)49 व्या बैठकीला उद्देशून बोलताना ते म्हणाले, तंत्रज्ञान बाजार आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही संघटनेत बदल घडवून आणण्यासाठी उत्पादकांची भूमिका महत्वाची असल्याचे पियूष गोयल यांनी म्हटले आहे. सदरच्या कामासाठी हातात हात घेऊन काम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. शेती आणि लॉजिस्टीक क्षेत्रांसाठी विशेष योजना आखण्याची गरज असून त्याच्या बळावरच उद्योग क्षेत्रात बदल करुन अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर देण्याची गरज असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.