रेडसीर कन्सल्टींगच्या अहवालातून स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये डिजिटल क्यवहार तीन पटीने वाढून 7,092 लाख कोटीवर पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. वित्तीय घडामोडींचा विचार करुन सरकारी नियम आणि व्यापारामधील वाढत्या डिजिटलायझेशनमुळे हा बदल होणार असल्याचा अंदाज रेडसीर कन्सल्टींगच्या अहवालातून मांडण्यात आला आहे.
देशामधील डिजिटल क्यवहाराचा व्यवसाय 2019-20 मध्ये जवळपास 2,162 लाख कोटींचा झाला होता. सध्याच्या कालावधीत 16 कोटी मोबाईल वापर करणारे ग्राहक हे डिजिटल व्यवहार करत असून यांची संख्या येत्या 2025 पर्यंत वाढून पाच पट होत 80 कोटींच्या घरात पोहोचण्याचे संकेत आहेत. सदरच्या वाढीसोबत एकूण डिजिटल व्यवहारात मोबाईल व्यवहाराची हिस्सेदारी 2025 पर्यंत 3.5 टक्क्मयांची राहणार आहे. जी सध्याच्या हिस्सेदारीच्या तुलनेत 1 टक्का अधिक आहे.
वॉलेटची भूमिका
सदर कामगिरीत वॉलेटची भूमिका महत्वाची राहणार आहे आणि यामध्ये लहान मोठी देवाणघेवाण वाढण्यास मोठा वाव मिळणार असल्याचाही अंदाज मांडला आहे. यामध्ये टायर दोन शहरांमधील असंघटीत क्षेत्राला व्यवसायातील डिजिटलकरणामुळे गती प्राप्त होणार असल्याचे संकेतही यावेळी नेंदवले आहेत.