विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी लावले फटाके, ढोल ताशांनी आनंदोत्सव केला साजरा
प्रतिनिधी /डिचोली
गोव्याचे मुख्यमंत्रिपदासाठी पुन्हा एकादा सांखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांचीच भाजप पक्षश्रे÷ाrंनी निवड केल्यानंतर सांखळी मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतदारसंघातील अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आले व ढोलताशांचा निनाद करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली कार्यक्षमता सिद्ध केली असल्यानेच त्यांना पुन्हा सदर पदावर बसविण्याचा निर्णय पक्षश्रे÷ाrंनी घेतला आहे, अशा प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मंगळवारी सकाळी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीला रवाना झाले होते. सांखळी मतदारसंघातील विविध भागात भाजप कार्यकर्ते, हितचिंतकांनी पक्षाचा तसेच डॉ. प्रमोद सावंत यांचा जयघोष करत जल्लोष केला. फटाके वाजवून या निवडीचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढेही वाटले.
प्रतापनगर हरवळे येथे स्थानिक पंचसदस्य तथा माजी सरपंच गुरुप्रसाद (संजय) नाईक व इतरांनी हातात भाजप पक्षाचे झेंडे घेऊन तसेच ढोल ताशांचा निनाद करीत घोषणा दिल्या. यावेळी पक्षाचे नेते कालीदास गावसही उपस्थित होते. प्रतापनगर भागात या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये गोवा राज्यासाठी केलेल्या कामांमुळेच आज त्यांच्याकडेच पुन्हा पक्षाने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी ते पुढील पाच वर्षांसाठी यशस्वीपणे पार पडणार आहेत. गोवा राज्याला आज त्यांच्या सारख्याच अभ्यासू आणि धडाडीच्या नेत्याची गरज आहे. ही गरज ओळखून भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. आणि तो विश्वास ते सार्थ करणार आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी पंच सदस्य संजय नाईक यांनी व्यक्त केली.
डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश!
गोव्यात निवडणुकीपूर्वी भाजपच्या आणि सरकारच्या विरोधात वातावरण असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे राज्यात यावेळी भाजपचे सरकार स्थापनही होणार नाही, असेही बोलले जात होते. परंतु हे सर्व विरोधकांचे दावे फोल ठरविताना डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी चोखपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपने गोव्यात वीस जागांवर अभुतपूर्व यश मिळवले. अशी कामगिरी यापूर्वी कधीही झाली नव्हती. यावेळी कोणत्याही पक्षाबरोबर युती नसताना भाजपने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश मिळविले. याच नेतृत्वगुणांची पारख करून केंद्रीय पक्षश्रे÷ाrंनी डॉ. प्रमोद सावंत यांनाच मुख्यमंत्रिपद दिले आहे. अशी प्रतिक्रिया सांखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी व्यक्त केली.
पक्षश्रेष्ठींकडून दखल!
चांगल्या कामाला चांगले फळच मिळते. डॉ. प्रमोद सावंत यांनी गेली तीन वर्षे राज्याची केलेली अविरत सेवा आणि कल्याणासाठी केलेले कार्य प्रत्येक गोवेकराच्या मनात आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रे÷ाrंनी त्यांचीच पुन्हा मुख्यमंत्रिपदी निवड केली, असे नगरसेवक दयानंद बोर्येकर यांनी म्हटले.