प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सरकारच्या मंत्रिमंडळात आणखीन तीन मंत्र्यांचा समावेश करून शनिवारी विस्तार झाला. दोनापावला येथील कासो राजभवनातील नूतन दरबार हॉलमध्ये हा शानदार सोहळा पार पडला. निवडणुकीपूर्वी भाजपाबरोबर युती धुडकावली तरी आता सरकारला समर्थन देणाऱया मगो पक्षाचे नेते रामकृष्ण उफ्&ढ सुदिन ढवळीकर, मागच्या विधानसभेत काँगेसपक्षातून भाजपामध्ये आलेले नीळकंठ हळर्णकर आणि उपसभापतीपदावर नाराज झालेले सुभाष फ्ढळदेसाई यांना राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची आणि गोपनियतेची शपथ †िदली. विशेष म्हणजे तिघाही मंत्र्यांनी मराठीतून शपथ घेतली.
राजभवनातील दरबार हॉल नव्या मंत्र्यांच्या समर्थकांनी गच्च भरला होता. बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, सुभाष †िशरोडकर आदी मंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थिती होती, मात्र कृषिमंत्री रवी नाईक, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांची अनुपस्थिती कटाक्षाने जाणवत होती. सरकारला पाठिंबा देणारे तिनही अपक्ष आमदार या सोहळ्याला गैरहजर होते.
सांगे मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले आमदार सुभाष फ्ढळदेसाई यांना उपसभापतीपद देण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला. दुपारी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारली ः सुभाष फ्ढळदेसाई
आपण मंत्रिपदाचा हट्ट धरला नव्हता व उपसभापतीपदावर आपण नाराजही नव्हतो पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणे निष्ठावान कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. ज्यांच्याकडे जी योग्यता आहे ती पाहूनच जबाबदारी दिली जाते. आपली योग्यता मंत्री म्हणून योग्य आहे, असे मुख्यमंत्र्यांना वाटले असेल म्हणून त्यांनी उपसभापतीपद काढून घेउढन मंत्रिपद दिले असेल, असे नवनियुक्त मंत्री सुभाष फ्ढळदेसाई यांनी सांगितले.
उपसभापती असणे आणि मंत्री असणे यात काही फ्ढरक नाही मात्र संपूर्ण गोव्याच्या विकासात हातभार लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यासाठी आपण त्यांचे आभार मानत असल्याचे मंत्री फ्ढळदेसाई म्हणाले.
आपण आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवणे हे प्रत्येक आमदाराचे कर्तव्य आहे. सांगेच नव्हे तर संपूर्ण गोव्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते याची कल्पना सर्वांना आहे. आपल्या मतदारसंघात धरण असून याठिकाणाहून इतर भागात पाणी पुरवठा होतो पण स्थानिकांना वेळेत योग्य पाणी मिळत नाही ही समस्या प्राधान्याने सोडवली जाणार असल्याचे फ्ढळदेसाई म्हणाले.
बहुजन समाजाचा सन्मान ः नीळकंठ हळर्णकर
आपण बहूजन समाजातील नेता आहे. आपणास मंत्रिपदाची अपेक्षा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी देउढन बहूजन समाजाचा सन्मान केला आहे, असे थिवीचे आमदार तथा नवनियुक्त मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.
मंत्री हळर्णकर यांना कुठली खाती अपेक्षित आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, आपल्याला मंत्रिपदाची अपेक्षा नव्हती व खात्याचीही नाही. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जी खाती वाटली आहेत ती योग्यता पाहूनच दिली आहेत. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी ते सर्वांना विचारात घेतात हा त्यांचा मोठेपणा आहे. आपल्याला जबादारी देण्यापूर्वी ते विश्वासात घेतीलच पण कुठलीही जबाबदारी दिली तरी ती समर्थपणे पेलण्याचे आपले कर्तव्य असल्याचे मंत्री हळर्णकर म्हणाले.
झाले गेले विसरून जावे ः दीपक ढवळीकर
शपथविधी सोहळ्यास हजर असलेले मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना पत्रकारांनी गाठले व भाजप बरोबर युती करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे, असे यापूर्वी म्हणणारा पक्ष सरकारात कसा काय सामील झाला, यावर तुम्हांला काय वाटते असे ढवळीकर यांना विचारले असता ते म्हणाले की झाले गेले विसरून जावे, त्या त्या काळात जे योग्य वाटले ते ते पक्षाने आजपर्यंत केले आहे, त्याचा कधीच वाईट परिणाम झाला नाही, असे उत्तर ढवळीकर यांनी दिले.
आज मगोपेक्षा भाजपला समर्थनाची जास्त आवश्यकता आहे. स्थिर सरकार असेल तरच विकास झपाटय़ाने होतो. एकंदर गोव्याचा विकास आणि प्रगती नजरेसमोर ठेवून निवडणुकीच्या निकालादिवशीच बिनशर्त पाठिंबा जाहीर करून मगोने घोडेबाजाराला लगाम घतला होता, अशी टिपणी ढवळीकर यांनी दिली.
मगो पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी जे उद्दिष्ट ठेवले ते हे सरकार साध्य करते की नाही याकडे लक्ष देण्यासाठी व त्यादृष्टीने नियोजनात सहाय्य करण्यासाठी सरकारात सामील होणे योग्य असल्याचे ढवळीकर म्हणाले.