सध्या कोरोना संकटामुळे जगासह देशातील आर्थिकचक्र हे सर्वाधिक प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले, यामध्ये बहुतांश देशांचा आर्थिक विकासाचा दर हा वजा राहिला आहे, तर विविध उद्योगधंदे काही काळ, तर काही उद्योगधंदे कायमस्वरुपी बंद पडले आहेत. परंतु दुसऱया बाजूला सकारात्मक बाब म्हणजे परिस्थितीप्रमाणे नवीन प्लॅटफॉर्मच्या मदतीने नवीन व्यवसायांचा उदयही याच काळात झाला आहे. उदा ः ऑनलाईन व्यापारासह नवीन स्टार्टअपची निर्मिती, आर्थिक देवाण घेवाणीसाठी डिजिटल मार्गाचा स्वीकार आदी. हाच धागा पकडून देशातील तत्कालीन वातावरणात सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थितीच्या बदलावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या आर्थिक विचारांचा त्यांच्या 130 व्या जयंतीनिमत्ताने घेतलेला हा मागोवा.
डॉ. आंबेडकरांचे उच्चशिक्षण अमेरिका व इंग्लडमध्ये झाले. यामध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामधून त्यांनी 1915 साली एम. ए. आणि 1917 मध्ये पीएचडी या पदव्या प्राप्त केल्या. त्या अर्थशास्त्र या विषयांमध्येच होत्या. त्यानंतर 1921 साली ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मधून डॉ. आंबेडकरांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही अत्युच्च पदवी मिळवली, ती देखील अर्थशास्त्र हा विषय घेऊनच. अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेत असताना त्यांनी अर्थशास्त्रावर मौलिक ग्रंथ लिहिले. तसेच त्यांनी इतर विषयांमध्ये जी महत्त्वपूर्ण ग्रंथनिर्मिती केली त्यातील बहुतेक ग्रंथांना अर्थशास्त्राचे परिमाण असल्याचे दिसून येते. त्यामध्ये अस्पृश्यता, जातिव्यवस्था यासारख्या सामाजिक समस्यांच्या आर्थिक परिणामांची केलेली मीमांसा महत्त्वाची आहे.
भारतामधील व्यापार, शेती व जातीव्यवस्था हे त्यांच्या आर्थिक विचारातील प्रमुख सूत्र राहिले आहे. या पार्श्वभूमीवर असे विचार महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच त्यावेळी मांडलेले आहेत. महात्मा फुलेंच्या विचारांना व शाहू महाराजांच्या कृतीला अर्थशास्त्राrय परिभाषेत बसवले. डॉ. आंबेडकर आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व प्रतिपादन करताना म्हणतात, ‘शेती हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही, तर ते राष्ट्रीय उत्पादनाचे एक मोठे साधन आहे. अशा साधनाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहू नये, तर ते आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन म्हणूनच त्याला महत्त्व दिले पाहिजे’.
डॉ. आंबेडकरांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था मागास राहण्याचे कारण ग्रामीण व्यवस्थेशी निगडित असलेली जमीन कसण्याची पद्धत. ही पद्धत वर्षानुवर्षे तशीच चालत आली होती. त्यामध्ये काळानुसार बदल करण्यात आला नव्हता, यामुळेच शेतीची समस्या सोडविण्यासाठी आंबेडकरानी सामूहिक शेती किंवा सहकारी शेतीचा पुरस्कार केला होता. त्यांच्या मते शेतीपासून उद्योगधंद्यांची फारकत होणे हे अर्थव्यवस्थेला धोकादायक असते पण शेतीबरोबर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढविल्यास शेतकऱयांचे प्रश्न सुटतील व अर्थक्यवस्थेला बळकटी देण्यास मदत होणार असल्याचे आंबेडकरानी स्पष्ट केले होते.
बाबासाहेबांच्या विचारांचा भारतीय चलन प्रणालीवर चांगलाच प्रभाव आहे. ब्रिटिश राजवटीखाली भारतीय रुपयाचे मूल्य सतत घसरत होते. 1923 मध्ये डॉ. आंबेडकरांनी ‘रुपयाचा प्रश्न’ या ग्रंथामध्ये या समस्येचे मूळ तसेच त्यावर उपाय सांगितले आहेत. त्यामुळे त्यानंतर ‘भारतीय चलन’ या प्रश्नावर लिहिणाऱया लेखकांनी या ग्रंथातील अवतरणे घेतली आहेत. आणि ती प्रमाणभूत मानली आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. मूल्याचे परिमाण हे सोने असले पाहिजे व चलनाची लवचिकता सोन्याशीच संबंधित असली पाहिजे. सोने हा पाया धरला तर विस्तार आणि संकोच अत्यंत सुलभ होईल असे त्यांना वाटत होते.
या ग्रंथासाठी आंबेडकरानी अफाट परिश्रम घेतले आणि खरी विद्वत्ता प्रकट केली असे दिसून येईल. ब्रिटिश वर्तमानपत्रांनी या ग्रंथाचा गौरव खालील शब्दांमध्ये केला होता.
द टाइम्स ः इंग्रजी भाषेतील लेखनाची सुलभ शैली आणि विषयाचे सखोल ज्ञान, आणि इकॉनॉमिक्स या विषयावर समर्थपणे लिहिलेला हा ग्रंथ आहे.
स्कॉटमन ः हे पुस्तक लिहिण्यात आत्यंतिक काळजी घेतली असून परिश्रम पूर्वक केलेल्या संशोधनाचे हे फळ असल्याचे उघड दिसते. विषय मांडणीच्या व विचारांच्या नाविन्यामुळे भारतीय अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला अभ्यास करण्याची शिफारस करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या मते भारताचा विकास हा औद्योगिकीकरणाशिवाय अशक्मय आहे. त्यांच्या मते, मोठय़ा प्रमाणातील रोजगार वाढला तर आवश्यक वस्तूंचे उत्पादन वाढून त्यांचा मोठय़ा प्रमाणात खप वाढतो. यासाठी कच्चा माल व कामगारांची मागणी वाढते. परदेशी भांडवलावरील अवलंबित्व कमी होणे आणि कामगारांच्या रोजगाराच्या सुरक्षेत वाढ होते. या सर्व घटनांमुळे देशाचा आर्थिक विकास जलद होण्यास मदत होते.
सामान्य माणसाला फायदेशीर ठरू शकेल असे, आर्थिक विकेंदीकरण करण्यावर बाबासाहेबाचा भर होता. भाववाढीने सामान्य माणून होरपळून जाऊ नये अशा चलन व्यवस्थेचा ते पुरस्कार करतात. डॉ. बाबासाहेबांमधील तत्त्वज्ञान आणि अर्थ तज्ञास आपण तंत्रज्ञानांच्या युगात आज विसरत चाललो आहोत. केवळ जयंती उत्सवाचे राजकारण करून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील अर्थतज्ञ आपणास सापडणार नाही. त्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांना अंगीकृत करण्याची गरज आहे.
सागर के.