नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. घटनेचे रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित आणि वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांचे हे काम प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.
देशभरात कोरोना नियमांचे पालन करत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यासोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे.