प्रतिनिधी/ सातारा
येथील हिरकणी फौंडेशन च्या खजिनदार व धावपटू डॉ. शुभांगी गायकवाड या छ. शिवजयंती निमित्त शिवज्योत घेवून धावणार आहेत. त्या स्वराज्याची पाहिली राजधानी किल्ले राजगड ते अखेर ची राजधानी किल्ले अजिंक्यतारा एकुण 111 की. मी. अंतर दुर्गसेवकांच्या सन्मानार्थ सलग 12 तास धावणार आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे आजच्या तरूण पिढींना नवी प्रेरणा मिळणार आहे.
तसेच डॉ. शुभांगी ज्या ज्या गावातून धावणार आहेत. त्या त्या गावातील शिवप्रेमी व छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप चे मेंबर्स व माता भगिनी नी त्यांच्या सोबत 4 पाऊले चालावी अशी असे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. या उपक्रमाची नोंद ‘आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये होणार आहे.