ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या लढाईत आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांनाही पीपीई किट द्या अशी मागणी करत पोलिसांना पुरेशी सुरक्षा द्या अशा आशयाची जनहित याचिका मुंबई हाय कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ते सतिश गायकवाड यांनी एड. गणेश गुप्ता यांच्या तर्फे याचिका दाखल केली आहे. यामध्ये ड्युटीवरील सर्व पोलिसांना पीपीई किट तसेच त्यांना पूर्ण पागरासह धोक्याच्या परिस्थितीमध्ये ज्यादा काम करत असल्याने वेगळा भत्ता जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारात कपात करू नये, जेणेकरून त्यांचे मानसिकस खच्चीकरण होईल. असा दावा करण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवेतील लोकांप्रमाणे पोलीस कर्मचाऱ्यांना ही पीपीई किट दिले जावे, जेणेकरून या संकटाचा मुकाबला करताना त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे मनोबल वाढेल. असं ही म्हटले आहे.