आप्पाजी पाटील / नंदगड
गेल्या दोन दिवसापासून आकाशात ढग दाटून येत आहेत. कधी पाऊस पडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे नुकत्याच सुरुवात झालेल्या वीट उत्पादनावर संकट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे वीट उत्पादक चिंतेत सापडला आहे.
खानापूर तालुक्मयाच्या गर्लगुंजी, निट्टूर, गणेबैल, गंगवाळी, शेडेगाळी, सावरगाळी, गुंजी, कामतगा, माणिकवाडी, भालके, नावगा, हेब्बाळ, नंदगड, कसबा नंदगड, शिवोली, हडलगा, तोपिनकट्टी, बिदरभावी, बरगाव आदी भागातील माती विटासाठी उत्तम असल्याने या भागात सुगीनंतर तीन ते चार महिने विटाचे उत्पादन घेतले जाते. हिवाळा सुरू झाला की, वीट व्यवसायाला सुरुवात होते. वीट व्यवसाय हा एक आर्थिक उत्पादनाचा भाग मानला जातो. वीट व्यवसाय हा सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा बनला आहे. या व्यवसायासाठी तालुक्मयाच्या विविध भागातून तसेच हल्याळ, धारवाड, गोकाक, यमकनमर्डी आदी ठिकाणाहून हजारो कामगार दरवषी खानापूर तालुक्मयात येतात. आपले तळ ठोकून वीट उत्पादकाकडे विटा मारण्याचे काम करतात. या व्यवसायांवर वर्षभराची रोजीरोटी कमवतात.
व्यवसायाला जोमाने सुरुवात
तालुक्मयातील वीट व्यवसायाला आता जोमाने सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसापासून काही व्यावसायिकांनी विटासाठी आवश्यक असणाऱया मातीचा पुरेपूर साठा केला आहे. वीट तयार करण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. खानापूर तालुक्मयातील वीट चांगली असल्याने या विटांना गोवा, धारवाड, हुबळी, बैलहोंगलसह महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी मोठी मागणी आहे. त्यामुळे दरही बऱयापैकी मिळतो. सध्या साडेपाच रुपये एका विटेला दर आहे. सध्या वीट मारण्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी भट्टी बांधणी आणि भाजणे या प्रक्रियेला सुमारे महिना जाणार असून तोपर्यंत तरी हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
मजुरांना कामाची आवश्यकता
कोरोनामुळे काम नसल्याने यावषी साधरणतः पाच ते सहा महिने गोरगरीब मजूर कामगारांना कामे मिळाली नाहीत. त्यामुळे हालाखीच्या परिस्थितीत त्यांना दिवस काढावे लागले. केव्हा एकदा सुगी होते व त्यानंतर विट व्यवसाय सुरु होतो. याची चिंता कामगारांनाही लागली होती. बहुतेक कामगार गेल्या पंधरा दिवसापासून आपापल्या साहित्यासह विटा मारण्याच्या तळावर जाऊन पोचले आहेत. विटा मारण्याची प्रक्रिया गेल्या आठवडय़ापासून सुरू झाली असून एकदाची कामाला सुरुवात झाली असतानाच अचानकपणे आकाशात ढग दाटून येत असल्याने पाऊस पडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. त्यामुळे वीट उत्पादकांसह वीट तयार करणारे कामगार चिंतेत सापडले आहेत.
ढगाळ वातावरणामुळे मळणीची कामेही रखडली
खानापूर तालुक्मयात पावसाळय़ातील चार महिने बऱयापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भाताचे पीक घेतात. भात हे येथील प्रमुख पीक आहे.ख् ाानापूर तालुक्मयातील कापोली, हलगा, हलशी, बिडी, नंदगड, लोंढा, गुंजी, नेरसा, शिरोली, रामगुरवाडी, लालवाडी, चापगाव, गलगुंजी, लोंढा, जांबोटी, कणकुंबी तसेच हेम्माडगा या भागात भाताचे पीक घेण्यात येते. यावषी पाऊस बऱयापैकी पडल्याने पीक जोमाने आले आहे. ऑक्टोबर संपूर्ण महिना पाऊस पडण्यातच गेला. त्यामुळे शेतकऱयाला भाताची कापणी करणे अडचणीचे झाले होते. मात्र नोव्हेंबर महिन्यात भात कापणी व बांधणीची कामे शेतकऱयांनी करून घेतली होती. यानंतर फावल्या वेळेनुसार भात मळणीची कामे सुरू होती. अद्यापही मळणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहिल्याने पुन्हा मळणीची कामे रखडली आहेत.
ऊस तोडणी-शेतकरी द्विधा मनस्थितीत
खानापूर तालुक्मयातील ऊसाला चांगला उतारा असल्याने कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने खानापूर तालुक्मयातील ऊस नेण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून खानापूर तालुक्मयाच्या विविध गावातील शेतवडीतून ऊस तोडणी सुरू झाली आहे. या महिन्यात ऊस तोडणीचे काम जोरात सुरू होते. कमी पाण्याच्या जमिनीतील म्हणजे तर माळरानावरील ऊस तोडणी मोठय़ा प्रमाणात झाली असून पानथळ जमिनीतले पाणी जसजसे कमी कमी होते. त्याप्रमाणे त्या शेतात जाण्यासाठी वाटाही करण्यात आल्या होत्या. ऊसाची गाडी रुतून बसू नये याची दक्षता ही शेतकऱयांनी घेतली होती. त्यानुसार पानथळ जमिनीतील ऊस तोडणीलाही शेतकऱयांनी सुरुवात केली होती. परंतु अचानकपणे ढगाळ वातावरण आल्याने एखाद्यावेळी पाऊस पडला तर ऊस वाहतूक करणारे ट्रक अडकून पडतील, या चिंतेने ऊस तोडणी बाबत शेतकरी द्विधा मनस्थितीत आहेत.