दुरुपयोग केल्यास तंत्रज्ञान बुमरँगसारखे उलटते याची प्रचिती आणणारा ‘आरंभ : द बिगनिंग’ नाटय़प्रवेश शनिवारी शारदोत्सव सोहळय़ात सादर
प्रतिनिधी /बेळगाव
क्रीडाक्षेत्रात मॅच फिक्सिंग, उत्तेजक द्रव्य अशा गैरप्रकारांचा शिरकाव नवा राहिला नाही. तंत्रज्ञान हे माणसाला मिळालेले वरदान आहे. परंतु लालसेपोटी त्याचा दुरुपयोग झाला तर बुमरँगसारखे ते उलटते. हेच स्पष्ट करणारा ‘आरंभ ः द बिगनिंग’ हा नाटय़प्रवेश शारदोत्सव सोहळय़ात शनिवारी सादर करण्यात आला. प्रा. माधुरी शानभाग यांच्या कथेवर आधारित या नाटय़प्रवेशाचे नाटय़रुपांतर व दिग्दर्शन डॉ. संध्या देशपांडे यांनी केले.
संग्राम शिक्के देसाई हा शास्त्रज्ञ आहे. प्रयोगशाळेत त्याचे संशोधन सुरू आहे. 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत राजवर्धन राठोड वगळता अन्य खेळाडूंनी जनतेची निराशा केली. अशा परिस्थितीत 2020 चा ऑलिम्पिक सोहळा भारतात भरविण्याचा घाट क्रीडा सचिव पंजाबराव घालतात.
तंत्रज्ञानाने मुंगीचीही कमालच
संग्राम शिक्के देसाई त्यांना भेटायला जातात आणि नैसर्गिक जीन्सशी प्रोटीन वापरून खेळाडूंची ताकद दुप्पट करण्याचे तंत्रज्ञान आपण अवलंबू शकतो, असे स्पष्ट करतात. मुंगी आपल्या वजनाच्या 20 पट वजन उचलू शकते. मुंगी आणि माणसाच्या डीएनएमध्ये फारसा फरक नसतो. म्हणून त्या स्पेसिमनचा उपयोग करून वेटलिफ्टर्सना त्यांच्या क्षमतेपेक्षा 20 पट जास्त वजन उचलणे या तंत्रज्ञानाने शक्मय होते. यासाठी मुंगीचे स्पेसिमन वापरले जातात आणि धावपटूंसाठी चित्त्याचे स्पेसिमन वापरले जातात. अर्थातच ऑलिम्पिकमध्ये खेळाडू अतुलनीय अशी कामगिरी बजावून सुवर्णपदके पटकावितात. अपांग, ब्रजेश्वरी, पद्मनाभ, सुवर्णमयी हे सर्व खेळाडू सुवर्णपदकांसह संग्राम व पंजाबरावना भेटतात. परंतु नंतर सर्वच सुवर्णपदक विजेते वेगवेगळय़ा गंभीर आजाराची शिकार ठरतात.तरीसुद्धा पंजाबराव 120 कोटीच्या देशात चार, दोन खेळाडूंचा मृत्यू व अपघात सहज पचविला जातो, असे म्हणून हे वास्तव दडवू पाहतात. मात्र, संग्राम त्याला विरोध करतो आणि मी शास्त्रज्ञ आहे. मी प्रयोग करीन. पण यापुढील प्रयोग रोगाने जखडलेली माणसे, अपघातील जखमी जीव यांच्यासाठी राबवेन, असे स्पष्ट करतो.
कलाकार महिलांकडून भूमिका चोख
प्रवेशाची सुरुवात उस्ताद आणि जमुरा यांच्या संवादाने होते. जणू खेळाडू आणि क्रीडा मंत्रालय यांच्यातील नातेच हे दोघे स्पष्ट करतात. प्रयोगशाळा, दूरदर्शनच्या बातम्या, ऑलिम्पिक सोहळय़ाचा आभास असे नेपथ्य या प्रयोगाला उंची देऊन गेले. आकाश पंडित, सुनीता देशपांडे व सावन यांचे संगीत संयोजन प्रसंगानुरुप होते. नाटकात असणाऱया प्रत्येक कलाकार महिलेने आपली भूमिका समजून घेऊन काम चोख बजावताना टायमिंगही पाळले. चित्ता विशेष भाव खाऊन गेला. जमुरा आणि उस्ताद यांच्या प्रवेशाने काहीसे हलकेफुलके झालेले वातावरण प्रसंगाच्या शेवटी एका गंभीर व अंतर्मुख करणाऱया वळणावर येऊन ठेपते. वास्तव असेही असू शकते याचे प्रत्यंतर प्रेक्षकांना या प्रवेशाने दिले आणि त्यांना विचार करण्यास भाग पाडले, ही या प्रवेशाची पोचपावतीच म्हणावी लागेल. त्यानंतर ‘माऊली, माऊली’ हे नृत्य सादर झाले. सभागृहातून आलेली पालखी, पालखीसमोरील ध्वज, टाळांचा गजर आणि त्यानंतर ठेक्मयात सादर झालेले जोशपूर्ण नृत्य टाळय़ा घेऊन गेले. संगीत कार्यक्रमानंतर प्राची कुलकर्णी यांनी आभार मानले.