नवी दिल्ली
सरकार तंत्रज्ञान विकासासाठी नियमावलीच्या आराखडय़ात बदल करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. ते टीडीसॅटच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
आम्हाला सर्व डिजिटलसाठी जगभरासाठी एक वेगळी अशी मजबूत नियमावली तयार करण्याची गरज आहे. यामध्ये कायद्याचा आराखडा, नियमावलीचा आराखडा आणि सरकारी नियमांचा आधार घेत नागरिकांना प्रशिक्षित करुन आमुलाग्र बदल करण्यावर आगामी काळात भर देणार असल्याचेही मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे तंत्रज्ञान विकासावर काम करत अधिकचे स्टार्टअप एकत्रित जोडण्याची गरज आहे, कारण असे बदल आगामी काळात डिजिटल युगाचा चेहरा बदलण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. सध्या 4 जी नेटवर्कवर काम सुरु आहे. मात्र 5जी आणि 6जी संदर्भात देशाला अग्रेसर राहावे लागणार असल्याचे मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.
11 संस्थांसोबत तडजोड ः
आयआयटी-चेन्नई, आयआयटी-कानपूर, आयआयटी-मुंबई आणि आयआयएससी-बेंगळूरसह 11 संस्थांसोबत 14 महिन्यात फक्त 3 कोटी डॉलर्स खर्च करुन 4 जी तंत्रज्ञान तयार करण्यात आल्याचे मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.