बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत चालावी आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊन वाढीसंदर्भातचा निर्णय मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करून घेणार आहेत. ५ किंवा ६ जूनला मुख्यमंत्री राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबात निर्णय घेतील. दरम्यान, तांत्रिक सल्लागार समितीने लॉकडाऊन वाढीसंदर्भात कोणतीही शिफारस केली नसल्याचे मुख्यमंत्री यांनी रविवारी म्हंटले होते. आरोग्य मंत्र्यांनीही राज्यातील लोकडाऊन निर्बंध हटविण्याबाबतचा निर्णय वैज्ञानिक सल्ल्यानुसार सरकार घेईल आणि मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील, असे म्हंटले आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री सुधाकर म्हणाले की, निवडलेले प्रतिनिधी अतिशय लक्षपूर्वक काम करत असल्याने त्यांना खरी परिस्थिती कळेल.
अनेक आमदार आणि स्थानिक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या मतावर आधारित आपली चिंता व्यक्त करत आहेत. पण तज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्बंध हटविण्याबाबत सरकारने शेवटी निर्णय घ्यावा, असे मंत्री म्हणाले. तांत्रिक सल्लागार समितीने आपला अहवाल सरकारला सादर केल्यानंतर त्यावर मंत्रिमंडळात चर्चा होईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील एकूण कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच मुख्यमंत्री राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की निर्बंध शिथिल करायचे याविषयी योग्य निर्णय घेतील. दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.