वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कोरोना कालावधीत केंद्र सरकारकडून शेतकऱयांना मदतीचा हात मिळावा या हेतूने किसान क्रेडिट कार्डची योजना सादर केली आहे. सदर कार्डच्या मदतीने शेतकऱयांना कमी व्याजदरात कर्ज प्राप्ती व्हावी आणि त्यांचे शेतीसंबंधीचे काम कोणत्याही अडचणीविना पूर्ण व्हावे हाच संकल्प ठेवून ही योजना सादर करण्यात आल्याचे सांगितले आहे.
केंद्राकडून 17 ऑगस्ट 2020 पर्यंत शेतकऱयांना 1.22 कोटी किसान कार्डे देण्यात आली आहेत. सदर कार्डची एकूण मर्यादा ही 1,02,065 कोटी रुपये असल्याचेही स्पष्ट केले आहे. कोरोना कालावधीत शेतकऱयांना मदतीचा हात प्राप्त होत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत शेतकऱयांना जवळपास दोन लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सवलत व्याजदरामधून देण्यात येणाऱया कर्जाच्या माध्यमातून जवळपास 2.5 लाख शेतकऱयांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे म्हटलेले आहे. यामध्ये मत्स्यपालन आणि डेअरी उद्योग करणाऱया शेतकऱयांचा समावेश करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
कोरोनाच्या कालावधीत देण्यात येणारी ही आर्थिक मदतीची घोषणा आगामी काळात देशाला आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात शक्तीशाली ठरणार असल्याचा विश्वास सरकार व्यक्त करत असून ग्रामीण अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्वपूर्ण बदल करणार असल्याचे स्पष्टीकरण यावेळी केंद्राकडून करण्यात आले आहे.