गृह मंत्रालयाची राज्यसभेत माहिती
नवी दिल्ली
दिल्लीत निजामुद्दीनच्या कार्यक्रमात अनेक तबलिगी जमातचे लोक एकत्र आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला अशी माहिती गृह मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. लोक मोठय़ा प्रमाणात एकत्र जमले आणि अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तबलिगी जमातच्या 233 सदस्यांना अटक केली असून 29 मार्चपासून संघटनेच्या कार्यालयातून 2 हजार 361 जणांना बाहेर काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. एका लिखित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली. तबलिगी जमातच्या कार्यक्रमप्रश्नी संघटनेचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद यांची चौकशी सुरू आहे. या कार्यक्रमात कोरोनाचे कुठलेच नियम पाळले गेले नसल्याचेही रेड्डी यांनी राज्यसभेत
सांगितले.