आरोग्य मंत्रालयाचे स्पष्ट प्रतिपादन, तबलीग रूग्णांची संख्या 700 हून अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत निजामुद्दिन भागात झालेल्या तबलीग जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी 14 राज्यांमध्ये कोरोनाच्या साथीचा प्रसार केला, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय आरोग्य विभागाने केले आहे. या विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत या साथीच्या प्रसाराची कारण स्पष्ट करताना ही माहिती दिली. देशभरात तबलीग सहभागींचा शोध सुरू असून आतापर्यंत या कार्यक्रमाला गेलेल्यांपैकी 700 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी आणखी किती जणांपर्यंत ही साथ पोहचविली आहे, याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तबलीगच्या रूग्णांनी सर्व ताळतंत्र सोडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱया नर्सेसना पाहून ते अश्लील भाषा वापरत आहेत. डॉक्टरांवर थुंकत आहेत. तसेच त्यांना ठेवलेल्या वॉर्डातच उघडय़ावर मूत्रविसर्जन करण्याचे घाणेरडे आणि निर्लज्ज प्रकार ते करत आहेत. त्यांच्यावर उपचार करणेही कठीण झाले आहे. काही जणांनी अंगावरचे कपडे काढून नाच करण्याचे घृणित कृत्यही केले आहे, अशा अनेक तक्रारी त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाऱयांनी केल्या आहेत.
अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ले
विशिष्ट समाजाच्या वस्त्यांमध्ये पोलीसांवर हल्ले होण्याचे प्रकार देशात शुक्रवारी अनेक ठिकाणी घडले. लॉकडाऊनच्या काळात मशिदी बंद ठेवण्याचे आवाहन विविध राज्य सरकारांनी केले होते. त्याला शुक्रवारी हरताळ फासण्यात आला. अनेक मशिदींमध्ये नमाजासाठी गर्दी करण्यात आली होती. पोलीसांनी लोकांना पांगविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये हे प्रकार प्रामुख्याने घडले. यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. हे अत्यंत हीन संस्कृतीचे निर्लज्ज प्रदर्शन आहे, अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत.
रूग्णांची संख्या वाढली
गेल्या 24 तासात देशभरात कोरोना विषाणू संसर्ग झालेले नवीन 336 रूग्ण वाढले आहेत. देशभरातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2301 झाली आहे. मागील 24 तासात कोरोनामुळे 12 जण मृत्युमुखी पडले असून देशातील बळींचा आकडा 56 झाला आहे. आतापर्यंत 157 जण पूर्णबरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी शनिवारी दिली. गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
14 राज्यांतील 647 ‘तबलीग’ कोरोनाबाधित
गेल्या दोन दिवसांमध्ये तबलिग कार्यक्रमात सहभागी 708 रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, अंदमान आणि निकोबार, आसाम, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड तामिळनाडू, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड राज्यात हे रूग्ण आहेत. सर्व रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना डॉक्टरांना सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्य सचिव अग्रवाल यांनी केले. आरोग्य विभागातील डॉक्टर आणि मदतनीसांवर हल्ला करणाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी या वेळी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने अखिल भारत टोल फी कमांक 1930 तर पूर्वोत्तर राज्यांसाठी 1944 हा क्रमांक सुरू केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशमध्ये पहिला बळी
आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे 55 वर्षीय व्यक्तीचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांना मधूमेह आणि हृदयविकाराचा त्रास होता. दिल्लीवरून 17 मार्च रोजी आलेल्या त्यांच्या मुलास कोरोनाची बाधा झाली होती. याची लागण त्यांनाही झाली. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, गुजरातमध्ये 78 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात मृतांची संख्या आठ झाली आहे.