ढगाळ वातावरण असूनही पाऊस थांबल्याने लगबग : मजुरांचा जाणवतोय तुटवडा
खानापूर /बातमीदार
गेले दहा दिवस सातत्याने पडणाऱया पावसामुळे कापलेले भात पीक पूर्णपणे भिजून गेले होते. गवत पूर्णतः खराब झाले असून वर्षभराच्या गुजराणीसाठी थोडेफार भात मिळेल यासाठी आता शेतकऱयांनी धडपड सुरू केली आहे. परंतु शिवारात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने मजूर अधिक लागत आहेत. बहुतांश ठिकाणी भाताच्या दाण्यांना कोंब फुटल्याने शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्मयात पावसाळय़ातील चार-पाच महिने बऱयापैकी दमदार पाऊस होतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी भात पीक घेणेच पसंत करतो. तालुक्मयातील शेतकरी कापोली, हलगा, हलशी, बिडी, नंदगड, लोंढा, गुंजी, नेरसा, शिरोली, रामगुरवाडी, बरगाव, लालवाडी, चापगाव, गर्लगुंजी, जांबोटी, कणकुंबी तसेच हेम्माडगा या परिसरात भाताचे पीक घेण्यात घेतो. यंदा मध्यंतरी काही दिवस पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर भात पिकाला आवश्यक तेवढा पाऊस झाल्याने भात पिकाची जोमाने वाढ झाली. त्यामुळे भात पीक बऱयापैकी आले होते.
पिकलेल्या भातपिकावर पाऊस पडल्याने चिंता
दरवर्षीप्रमाणे यावषीही शेतकऱयांनी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भाताची पेरणी केली होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात हे भात कापणीला आले होते. परंतु त्यावेळी पाऊस पडत असल्याने भाताची कापणी करणे अडचणीचे झाले. पिकून आलेले भात कित्येक दिवस कापायचे राहिल्याने शेतातच जमिनीला टेकले होते. परिणामी भाताचे दाणे जमिनीवर पडून नुकसान होण्याची शक्मयता होती. याची चिंता शेतकऱयांना लागली होती. दरम्यानच्या काळात अनेक शेतकऱयांनी भुईमूग, शेंगा काढणे, मक्मयाची कणसे काढणे आदी कामे करून घेतली.
दसऱयानंतर मात्र पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. दरम्यानच्या काळात माळरानावरील भाताची कापणी करण्यात आली होती. परंतु दीपावली सणाच्या दरम्यान पुन्हा पावसाने जोर धरल्याने भात कापणीत व्यत्यय निर्माण झाला होता. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापासून पाणथळ जमिनीतील भात पिकाची कापणी शेतकरी करत होते. दरम्यानच्या काळातच अचानकपणे दमदार अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस तब्बल दहा दिवस मोठय़ा प्रमाणात झाला. त्यामुळे कापलेले भात पीक भिजले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी भात पीक पूर्णतः खराब झाले आहे.
मजूर कमतरतेवर तोडगा
तालुक्मयात सर्वत्र एकाच वेळी भात कापणी हंगाम आल्याने शेतकऱयांना मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे चार-पाच जण एकत्र येऊन गटाने भात कापणी करण्याची व्यवस्था केली जात आहे.