आरपीआय तर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
तमाशाकलावंत यांची मागील दीड ते अडीच वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे जनजिवन विस्कळीत झाले होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन उठविण्यात आला आहे. पण आजही तमाशा कलावंतांना उपासमारीचा, बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तमाशा कलावंतांनाही त्यांची कला सादर करण्याची परवाणगी देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे संजय गाडे, दिपक जाधव, विशाल कांबळे, सिध्दार्थ गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, कैलास परिहार, रियाझ मोमीन, दिपाली पाटणकर, गजानन बेलावडेकर, पापासाहेब सातारकर, मनिषा कौठेकर, कृष्णांत मोरे, विािय अकलेकर, रमेश कांबळे, संजय घाडगे आदी उपस्थित होते.
यावेळी मोकळय़ा जागेत सादर करण्यात येणाऱया सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदी उठवावी, तसेच या कलावंतांची दिवाळी ही गोड कशी कराता येईल याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा ऐन दिवाळी सनादरम्यान आपल्या कार्यालहाबाहेर प्रातिनीधीक स्वरूपात सांस्कृतीक कार्यकमान्वये आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.