● पॉझिटिव्हीटी घोटाळ्याचा दृश्य परिणाम● जिल्हा फुगवट्याच्या जोखडातून मुक्त● किराणा दुकान सकाळी 9 ते 2● मेडिकल सकाळी 9 ते 8● हॉटेल, रेस्टारंट फक्त पार्सल सेवा ● मैदाने, खुल्या जागा 5 ते 9 ● सार्वजनिक सेवा 50 टक्के क्षमतेने ● प्रशासनामुळे ऑक्सि बेड उपलब्धतेत जिल्हा मागे
दीपक प्रभावळकर / सातारा :
कोरोना अपलोड घोटाळा ‘तरुण भारत’ने जगासमोर मांडल्यानंतर साताऱयाच्या घोटाळय़ाचा राज्यभर हडकंप माजला. अखेर या पूर्ण घोटाळय़ाचे अनेक पुरावे जनतेसमोर मांडल्यामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले. फुगवटय़ामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सातारा जिल्हय़ाला मुक्त करण्यासाठी ‘तरुण भारत’ला एकाकी झुंज द्यावी लागली.यात जिल्हय़ातील लाखो लोकांचे पाठबळ लाभले. त्यामुळे राज्य शासनाचे निकष दाखवून जिल्हा प्रशासनाने लादलेल्या कृत्रिम लॉकडाऊनला ‘तरुण भारत’ आणि जनरेटय़ामुळे सपशेल लोटांगण घ्यावे लागले. 1 जुलैपर्यंत जिल्हय़ाला घरबंद ठेवणाऱया प्रशासनाचे मनसुबे अवघ्या पाच दिवसांत धुळीस मिळवण्यात तरुण भारतला यश आले.
कोरोनाचे आवश्यक नियम पाळा मात्र प्रशासनाच्या अनाठायी भितीला झुगारुन द्या, असेही आवाहन करत आहोत. आजपासून किराणा दुकाने सुरु होत असून हॉटेल रेस्टॉरंटच्या पार्सल सेवाही सुरू होत आहेत. यामुळे ‘तरुण भारत’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
कोरोना अपलोड घोटाळा ‘तरुण भारत’ने महाराष्ट्रासमोर आणल्यामुळे प्रशासनातल्या विविध बाबींचा हलगर्जीपणा आता चव्हाटय़ावर आला आहे. बाधितांची माहिती वेळीच अपलोड न केल्यामुळे जिल्हय़ाची पॉझिटीव्हीटी कृत्रिमरित्या फुगली. अशाच प्रकरणांचा शोध घेताना ‘तरुण भारत’ समोर ‘आरे-कारी’ प्रकरण समोर आले. ते मांडल्यानंतर अनेक गावांमधून विविध माहिती समोर येवू लागली. त्यावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन लोकप्रतिनिधींकडून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्नही झाला. मात्र वास्तवता बदलता येत नाही. कागदोपत्री आकडेवारीने लॉकडाऊनच्या कचाटय़ात अडकलेल्या सातारा जिल्हावासियांची दि. 7 तारखेपासून सुटका होत आहे. यामुळे जिल्हा कृत्रिम आकडेवारीच्या जोखडातून मुक्त होत आहे.
आकडेवारीच्या फुगवत्याने सातारा चौथ्या टप्प्यात
सातारा जिह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापल्याची निकषानुसार शासनाने घोषित केलेल्या स्तरानुसार, सातारा जिल्हा चौथ्या स्तरामध्ये आहे. संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हय़ातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सद्यस्थितीत लागू असलेल्या निर्बंधानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 7 जून रोजीचे 12 वाजल्यापासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाच्या षंढपणामुळे जिल्हा ऑक्सिजन बेडमध्ये मागे
शासनाने पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांवर लॉकडाऊनचे निर्बंध सांगितले आहेत. जिल्हय़ात पॉझिटीव्हीटीचा घोळ झाला असल्याचे ‘तरुण भारत’ने पुराव्यानिशी सिद्ध केले. आता प्रश्न राहिला ऑक्सिजन बेडचा जिल्हय़ात 3 हजार 343 ऑक्सिजन बेड असून सध्या 1 हजार 748 बेडवर रुग्ण आहेत. म्हणजेच जिल्हय़ात अक्युपाईड बेड 52.24 टक्के आहेत. जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्याभरात ऑक्सिजन बेड वाढवले असते तर ऑक्सिजन बेड उपलब्धता या निकषातूनही बाहेर पडला असता.
शनिवार, रविवारी पूर्ण संचारबदी
जिह्यामध्ये सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत सायं. 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत तसेच आठवडय़ाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक बाबींची दुकाने/आस्थापना या सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल/औषधांची दुकाने सकाळी 9 ते सायं 8 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल/औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल, रेस्टॉरंटस् ही केवळ पार्सल घरपोचसाठी सकाळी 9 ते रात्री 8 वा. पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल.
‘या’ गोष्टींना अद्याप परवानगी नाही
अत्यावश्यक नसलेली दुकान/आस्थापना या पुर्णपणे बंद राहतील. यामध्ये मॉल, सिनेमागृह, नाटय़गृहे पुर्णपणे बंद राहतील. या ठिकाणी बसण्यासाठी परवानगी नाही. ज्या खाजगी कार्यालयांना मुभा देण्या आलेली आहे अशी कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील. शासकीय कार्यालये व ज्या खाजगी कार्यालयांना परवानगी देण्यात आलेली आहे अशा कार्यालयांना 25 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. हॉटेलमधील लॉजिंग सुविधा पुर्णपणे बंद राहील. बार, परमिटरुम व वाईन शॉप इत्यादीबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. सार्वजनिक जागा, खुली मैदाने/चालणे/सायकल चालविणे यासाठी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी 5.00 ते सकाळी 9.00 या वेळेत परवानगी असेल. आठवडयाचे शेवटी म्हणजेच शनिवार व रविवार यास मनाई आहे. लग्न समारंभास पूर्वीचेच निर्बंध कायम आहेत.
‘तरुण भारत’ वर अभिनंदनाचा वर्षाव
कडक उन्हाळय़ात एप्रिलमध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरु केला. याच भितीच्या वातावरणाखाली मे महिना देखील गेला. मात्र दैनंदिन 2 हजारांच्या पटीत होणारी बाधित थांबत नव्हती. तर जिल्हय़ात टेस्टिंगची क्षमता 7 हजार एवढी असताना दररोज 10 हजारांच्या पुढे तपासण्या केल्याचे अहवाल समोर येवू लागले. याबाबत प्रशासनाशी ‘तरुण भारत’ने सातत्याने संपर्क साधला. त्यावेळी पेंडिग अहवाल भरण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येवू लागले. मात्र, हेच फुगलेल्या आकडेवाडीचे वास्तव मांडल्याने जिल्हा लॉकडाऊनच्या खाईत लोटला. मात्र तो लॉकडाऊन शिथील करण्यात आल्याने जिल्हाभरातून मान्यवरांसह नागरिकांनी ‘तरुण भारत’वर अभिनंदनाचा वर्षाव केला.
लोकप्रतिनिधींमुळे नव्हे, लोकरेटय़ामुळे लॉकडाऊन शिथील
दैनंदिन वाढणारी कोरोना बाधितांची आकडेवारी पाहून जिल्हावासिय भयभीत झाले होते. अनेकजण नुसता पॉझिटिव्ह अहवाल आलाय म्हटले तरी 50 टक्के घाबरुन जात होते. बेड मिळण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट सुरु होती. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना देखील वेळ नव्हता. मात्र, जिल्हय़ातील पॉझिटिव्हीटी रेट का वाढतोय याबाबत ‘तरुण भारत’ने नेहमीच्या सडेतोडपणे लोकहिताची भूमिका मांडली. जनभावना ‘तरुण भारत’च्या पाठीशी उभी राहिली होती. लॉकडाऊन रद्द करा, अशी मागणी वाढू लागली होती. या जनरेटय़ाची दखल प्रशासनाला घ्यावी लागली आहे. लॉकडाऊन शिथील झालाय तो लोकप्रतिनिधींमुळे नव्हे तर लोकरेटय़ामुळे झाला आहे.
‘या’ अत्यावश्यक सेवा सुरु
रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मटण, चिकन, अंडी, मासे विक्री दुकाने, कृषी सेवा केंद्रे, पेट्रोल, डिझेल पंप, कोल्ड स्टोअरेज, गोदाम, सरकारी, खासगी सुरक्षा सेवा, अधिकृत मिडिया, अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी गॅरेज, स्पेअर पार्ट दुकाने, पंक्चर दुकाने, बँका, सुक्ष्म वित्त संस्था, वर्तमानपत्रे, प्राण्यांवर उपचार करणारे पशुवैद्यकीय दवाखाने, अत्यावश्यक मालवाहतूक, औद्योगिक कंपन्या, बांधकाम क्षेत्र, लग्न कार्य, सार्वजनिक संस्थांच्या सभा, बैठका यांना नियम व अटीनुसार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
दीपक प्रभावळकर 9326403232, 9628403232