प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ातील अग्रगण्य वृत्तपत्र ‘तरुण भारत’ने सुरू केलेल्या महिलांसाठीच्या ‘अस्मिता’ या व्यासपीठाच्या माध्यमातून ‘पौष्टीक खाद्यपदार्थ’ या संकल्पनेवर आधारित पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा हॉटेल आयोध्या येथे शनिवार 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. केवळ महिलांसाठी मर्यादित असलेल्या या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या स्पर्धेसाठी राजाकाका इलेक्ट्रॉनिक व व्दारकादास शामकुमार प्रायोजक असून विजेत्यांचा आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. पौष्टीक खाद्यपदार्थ स्पर्धेत कोल्हापुरातील महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘तरुण भारत’परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
‘तरुण भारत’तर्फे महिलांच्या अंतर्मनाच्या आविष्कारासाठी ‘अस्मिता’ या हक्काच्या व्यासपीठाची निर्मिती केली आहे. यामध्ये महिलांना विनामूल्य सभासद केले जाते. ‘अस्मिता’च्या वतीने ‘पौष्टीक खाद्यपदार्थ’ या संकल्पनेवर आधारित पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांनी घरातून शुद्ध शाकाहारी पौष्टिक पदार्थ तयार करून आणावयाचे आहेत. हे पदार्थ आकर्षक सजावट करून आयोध्या हॉटेलमध्ये दिलेल्या नियोजित टेबलवर मांडायचे आहेत. स्पर्धकांनी मांडलेल्या पदार्थांची नामवंत परीक्षक चव पाहून विजेत्या निश्चित करणार आहेत. यातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे एकूण 18 बक्षिसे स्पर्धकांना दिली जातील. स्पर्धा संपल्यानंतर लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ व स्पॉट गेमचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन पैठणी व उत्तेजनार्थ आकर्षक 25 बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तरी सर्व ‘अस्मिता’च्या सदस्यांनी उपस्थित राहावे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुरुवार 6 फेब्रुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत नावनोंदणी मुदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 9607993296 या मोबाईल नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘तरुण भारत’ परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
स्पर्धेतील बक्षिसे
प्रथम क्रमांक : ओव्हन
द्वितीय क्रमांक : वॉटर प्युरिफाय
तृतीय क्रमांन : ब्लेंडर
उत्तेजनार्थ :आकर्षक 15 बक्षीसे.
लकी ड्रॉ आणि स्पॉट गेम :तीन पैठणी आणि 25 आकर्षक बक्षिसे