सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत शुभेच्छा सोहळा
प्रतिनिधी /निपाणी
सीमाभागातील जनतेचे मुखपत्र, सामान्य जनतेचा बुलंद आवाज, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे दैनिक अशी ओळख असलेल्या तरुण भारत निपाणी कार्यालयाचा 15 रोजी वर्धापन दिन साजरा होत आहे. सदर कार्यक्रम बसस्थानकानजीक असलेल्या मानवी कॉम्प्लेक्समधील तरुण भारत कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार असून कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून उपकृत करावे, असे आवाहन तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार, संपादक किरण ठाकुर, संचालिका रोमा ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांनी केले आहे.
गेल्या पाच पिढय़ांनी तरुण भारतच्या कार्यास नेहमी पाठबळ दिले आहे. त्यामुळे लोकांशी तरुण भारतचे स्नेहबंध वृद्धिंगत होत गेले आहेत. अशा वाचकांप्रती असणारे नाते यापुढेही कायम रहावे, यासाठी दरवर्षी तरुण भारत परिवारातर्फे वर्धापन दिन आयोजित केला जातो. यावेळी वाचक, हितचिंतक यांच्या गाठीभेटीतून हे नाते आणखी दृढ होते. त्याच उद्देशाने वाचकांच्या या लोकप्रिय दैनिकाच्या निपाणी कार्यालयाचा वर्धापन दिन 15 रोजी आयोजित केला आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून आमच्या कार्याला उपकृत करावे, असे आवाहन तरुण भारत परिवारातर्फे करण्यात आले आहे.