31 ऑक्टोबरपर्यंत योजनेत गुंतवणूक करता येणार
प्रतिनिधी /बेळगाव
तरुण भारत सौहार्द सहकारी नियमिततर्फे नवरात्रीचे औचित्य साधून अमृतधन मुदत ठेव योजना व धनसागर रिकरिंग ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. दि. 7 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये या योजनेत गुंतवणूक करता येईल. अमृतधन योजनेंतर्गत गुंतवणूकदारांना एका लाखाच्या गुंतवणुकीवर 27 महिन्यांत सव्वा लाख परतावा मिळेल. किमान गुंतवणूक रुपये 10,000 व त्या पटीत करता येईल.
याचप्रमाणे धनसागर रिकरिंग ठेव योजनेंतर्गत दर महिन्याला किमान 600 रुपये 5 वर्षे 3 महिने भरल्यास 50,000 रुपये परतावा मिळेल. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर या योजनांचा शुभारंभ झाला असून या संधीचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, नार्वेकर गल्ली, बेळगाव, फोन 0831-2424777 किंवा 9108540877 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.