आजरा / प्रतिनिधी
दैनिक तरूण भारतच्या आजरा कार्यालयाचा यंदाचा वर्धापनदिन सोहळा कोरोनाचे नियम पाळत साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षी होणारा जाहीर स्नेहमेळावा यावर्षी कोरोनामुळे रद्द करावा लागला. वर्धापनदिनानिमित्त कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांनी तरूण भारतला शुभेच्छा दिल्या.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते पुरवणी प्रकाशन झाल्यानंतर सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजू पोतनीस, देवर्डेचे सरपंच जी. एम. पाटील, उपसरपंच मारूती बुरूड, डॉ. धनाजी राणे, तालुका संघाचे अकौटंट आनंदा कुंभार, सिद्धार्थ पाटकर, शिवाजी गोवेकर, सुरेश देसाई, शिवाजी पाटील, कारखान्याचे माजी संचालक सुभाष देसाई, तालुका संघाचे नूतन संचालक मधुकर येलगार, सामाजिक कार्यकर्ते रशिद पठाण, गंगामाई वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर, संचालक रविंद्र हुक्केरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार, सामाजिक कार्यकर्ते वृषाल हुक्केरी, अशोक शिंदे, नंदकुमार देसाई, पेरणोली येथील रवळनाथ चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी देसाई, तानाजी मिसाळ, जिल्हा बँकेचे जयवंत पाटील तसेच राजेंद्र पाटील, विनायक पाटील, तानाजी हासबे, दशरथ मुगुर्डेकर, तानाजी लाड, मिलिंद पाटील, आकाश नावलकर, रवी पाटील, सुनील कोंडूसकर यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
याबरोबरच रामतीर्थ शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुभाष चौगुले, व्हा. चेअरमन दशरथ कांबळे, मॅनेजर विजय पत्ताडे, माध्यम प्रतिनिधी ज्योतीप्रसाद सावंत, सचिन चव्हाण, अरूण भोगले, रणजित कालेकर, सचिन कळेकर, सदाशिव मोरे, विकास सुतार, रमेश चव्हाण, बशीर मुल्ला आदींनी शुभेच्छा दिल्या.