जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश, परवान्यासाठी स्थानिक पोलीसांना अधिकार
प्रतिनिधी / वारणानगर
सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवर असणाऱ्या वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकऱ्यांनी पोलीसांच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे शेतात जाण्यासाठी मागितलेल्या परवान्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ठ आदेश दिल्याने वारणेच्या सिमेवरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी परवाना प्राप्त झाला असून परवान्याचे अधिकार स्थानिक पोलीसांकडे दिले आहेतभारत सरकार व महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न, उत्पादन, शेती साधनांचे वितरण व किरकोळ विक्री, विविध कृषी यंत्रसामग्री व उपकरणे यांची विक्री इत्यादी कापणीसारख्या विविध कृषी कार्यात स्पष्ट केले. या अनुषंगाने महसूल व वनविभागाचे मुख्य सचिव अजय मेहता यानी दि. ४ मे रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी यांना काढलेल्या आदेशात शेतीसह शेतीपूरक उद्योग, कृषी यांत्रीक साहित्याची तसेच बी बीयांनाची दुकाने यांना गर्दी टाळण्यासाठी वेळ वाढवावा तसेच शेतकरी व शेतमजूर यांना पूर्णता या कामासाठी मुक्त मोकळीक मिळावी कोठेही अडवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोलीस यंत्रनेला आदेश द्यावेत, कृषी अधिकारी यांनी पास द्यावेत, असे आदेश दिले आहेत तथापि जिल्हा बंदीच्या नांवाखाली चेकपोष्टवर असलेले पोलीस शेतकऱ्यांची अडवणूक करीत होते. याचे वास्तव वारणा नदीच्या तिरावरील दोन्ही जिल्ह्याच्या सिमेवरील गांवात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून अनुभवायला मिळत होते.
अखेर वारणा परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीसांच्या त्रासाला कंटाळून थेट जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना शेतात जाण्याचा परवाना निवेदनाद्वारे मागितला यावर जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी बैठक केल्यावर पन्हाळा उपविभागाचे प्राताधिकारी अमित माळी यांना हा प्रश्न सोडवण्याचा आदेश दिल्यावर प्रांताधिकारी आमित माळी यानी प्रांताधिकारी इस्लामपूर, यांच्याशी चर्चा करून कुरळप पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अरविंद काटे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांना सातबारा व आधार कार्डाची छायाकिंत प्रत घेवून शेतकऱ्यांची स्वतंत्र परवाना यादी तयार करून सिमेवरील चेकपोष्टवर देवून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सोडण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रातांधिकारी अमित माळी यांनी दिेल होते. आज शनिवार पर्यन्त जवळपास ८० शेतकऱ्यांना तसे परवाने दिले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी,पन्हाळा, हातकंणगले,शिरोळ सांगली जिल्ह्यातील शिराळा,वाळवा, मिरज या सात तालुक्यातील वारणा नदीच्या दोन्ही तिरावरील गांवातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी कमी अधिक प्रमाणात अलिकडे – पलीकडे करण्याचा प्रश्न भेडसावत आहे. याचा शेतकऱ्यांना होणारा त्रास वाचवणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षक यांना शेतकऱ्यांची अडवणूक न होणे बद्दल स्वयंस्पष्ठ आदेश काढण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे. तथापी सद्या बारणेच्या तिरावरील सिमेवर असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी शेतात ये – जा करण्यास त्रास होत असलेस स्थानिक पोलीस ठाणे, जिल्हा कृषी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांना संपर्क करून सातबारा, अधारकार्डच्या छायाकिंत प्रत जोडून अर्ज करावा असे आवाहन शेतकरी माजी प्रा.एस.के. पाटील, रा.अमृतनगर ता. पन्हाळा यांनी केले आहे.