ऑनलाईन टीम / मुंबई :
बाबरी मशीद प्रकरणात लखनऊच्या सीबीआय विशेष न्यायालयाने सर्व 32 आरोपींची सुटका केली आहे. न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
संजय राऊत म्हणाले, न्यायालयाने सांगितले की, ही घटना पूर्व नियोजित नव्हती आणि हाच निर्णय आम्हांला अपेक्षित होता. आता आपल्याला हा भाग विसरला पाहिजे. आता अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे. जर बाबरी पडली नसती, तर आज राम मंदिराचे भूमिपूजन झाले आहे, तो दिवस आपल्याला पाहताच आला नसता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सीबीआयकडून करण्यात आलेले अनेक युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने मागील 28 वर्षांपासून सुरू असलेल्या बाबरी मशीद खटल्यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.