वार्ताहर/ राजापूर
राजापुरातील आठवडा बाजाराबाबत आलेल्या अनेक तक्रारीनंतर राजापुरचे नगराध्यक्ष ऍड जमीर खलीफे यांनी गुरुवारी अचानक आठवडा बाजाराला भेट दिली. त्यावेळी बाजारातील भाज्यांच्या दरातील तफावत दिसुन आली. अनेक व्यापायांसह नागरीक देखील मास्कशिवाय आढळुन आले. सातत्याने प्रशासनाकडुन सुचना देण्यात येवुन देखील जर त्या पाळल्या जाणार नसतील तर यापुढे कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय रहाणार नसल्याचा इशारा नगराध्यक्ष ऍड खलीफे यांनी दिला आहे.
कोविडच्या जैविक संकटामुळे गेल्या मार्च महिन्यापासुन राजापुरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार प्रदिर्घकाळ बंद होता, मात्र कोविडचा प्रभाव कमी होत असल्याने गेल्या गुरुवारपासुन राजापुरचा आठवडा बाजार पुर्ववत सुरु झाला होता मात्र पहिल्याच बाजार पासुन अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामध्ये भाजा rविक्रेत्यांबद्दलच्या तक्रारी सर्वाधिक होत्या. दरात तफावत असल्याने नागरीकांची लुट होत असल्याचे सुर सुरु होत.s त्या पार्श्वभुमीवर राजापुरचे नगराध्यक्ष ऍड जमीर खलीफे यांनी गुरुवारी अचानक काही कर्मचाऱयांसह आठवडा बाजाराला भेट दिली त्यावेळी काही पत्रकार देखील त्यांच्या समवेत होते. आठवडा बाजारात अचानक आलेल्या नगराध्यक्षांना पाहुन धावाधाव झाली. त्यावेळी अनेक व्यापारी मास्कशिवाय मालाची विक्री करताना आढळले. यामध्ये भाजीविक्रेते, कपडय़ाचे व्यापारी आदींचा सामावेश होता. तर सोशल डिस्टंसिंगचा तर फज्जा उडालेला पहायला मिळाला. अनेक नागरीक देखील मास्क न वापरता बिनधास्तपणे बाजारात फिरत होते.
आठवडा बाजारात अचानक आलेल्या नगराध्यक्षांना पाहुन एकच धावाधाव उडाली काहीजण तर खिशात ठेवलेले मास्क बाहेर काढुन लावण्याचा प्रयत्न करताना दिसुन आले. आठवडा बाजारातील गचाळपणा देखील नगराध्यक्षांच्या नजरेला आला काही भाजीविक्रेत्यांनी आपला खराब झालेला माल बाजुला ठेवला होता. खराब माल बाजारात ठेवुन गेलात तर कारवाई करु असा इशारा देण्यात आला. सातत्याने सुचना देवुन देखील आठवडा बाजारातील व्यापारी नियम पाळणार नसतील मास्क वापरणार नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईलच शिवाय पुढील गुरुवारी बाजारात माल विक्रीला परवानगी दिली जाणार नाही असा इशारा नगराध्यक्ष ऍड खलीफे यांनी दिला.
आठवडा बाजारातील दरातील तफावतीबाबत आलेल्या तक्रारीत देखील तथ्य असल्याचे आढळुन आले. प्रत्येक व्यापाऱयाच्या भाजी दरात कमालीची तफावत आढळुन आली एकच प्रकारच्या भाजीचे वेगवेगळे दर पहायला मिळाले. त्या व्यापायांनाही नगराध्यक्षांनी योग्य त्या सुचना दिल्या. नियमांचे पालन केले नाहीत तर कारवाई केली जाईल असा इशारा द्यायला नगराध्यक्ष विसरले नाहीत.