मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या निवासस्थानी ईडीकडून आज सकाळी छापेमारी करण्यात आली. यांनतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच संजय राऊत यांनी सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत का असा सवालही संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, भाजपाकडून सचिन वाझेंच्यापत्रातील आरोपांप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचीदेखील सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून यासंबंधी बुधवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे.
दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. यांनतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचे म्हंटले आहे.