प्रतिनिधी / कोल्हापूर
केवळ राजकीय आकसातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला लक्ष करीत आहेत. दसरा मेळाव्यात अतिशय खालच्या पातळीवर भाजप नेत्यांना शिवराळ भाषेत टिका केली. मात्र आता यापुढे हे खपवून घेणार नाही. गाल पुढे करणाऱयातले आम्ही नाही. ठाकरे शैलीचा आम्हालाही चांगला अभ्यास आहे. त्यामुळे त्यांच्याच भाषेत ठोकून काढायाल मागे पुढे पहाणार नाही. असा खणखणीत इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. सोमवारी मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदे एका प्रश्नावर ते बोलत होते.
ते म्हणाले, दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे भाषण हे शिमगा मेळाव्या सारखे झाले. या भाषता फक्त भाजपच्या नावाने शिमगा करण्यात आला. आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत. याचही भान त्यांना नव्हतं इतक्या खालच्या पट्टीतील शब्दात भाजप नेत्यांवर टिका करण्यात आली. हिंदुत्वाचा ठेका यांना दिलेला नाही. कोण ठोंग करतयं हे जनतेला चांगलेच महिती आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदाची गनिमा राखली नाही. तर इतरांची कशाला चौकशी करता, अशा शब्दात फटकारत नारायण राणे यांची पाठराखण केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून दसरा मेळाव्यात जनतेच्या प्रश्नांना हात घालणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. कोरोनामुळे पुढील शैक्षणिक धोरण काय असेल, सत्र कसे ठरवणार या विषयी काहीच हालचाली नाहीत. या गंभीर विषयाकडे सरकार आणि त्यामधिल मंत्री अजिबात गंभीर नाहीत. असा आरोपही त्यांनी केला.