ऑनलाईन टीम / लाहोर :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तर जगजाहीर आहेत. दोन्हीं देशात बिघडलेल्या राजकीय संबंधचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसत आहे. पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तानला आपल्या आशिया चषकाच्या यजमानपदावर पाणी सोडावं लागलं आहे.
बीसीसीआयच्या या भूमिकेनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. आशिया चषकाचं यजमानपद कोणाकडे द्यायचं हा निर्णय आयसीसीचा नव्हे तर आशियाई क्रिकेट परिषदेचा आहे. सध्याच्या घडीला आम्ही आशिया चषकासाठी दोन पर्यायांचा विचार करत आहोत.
जर भारताने या ठिकाणी येण्यास नकार दिला, तर पाकिस्तानही 2021 साली भारतात होणाऱया टी-20 विश्वचषकात सहभागी होणार नाही. अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी एका वृत्तपत्राला मुलाखतीत दिली.
आशिया करंडक स्पर्धेच्या आयोजनातील बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद किंवा पीसीबी यांच्या विशेषाधिकारात येत नाही. आयोजनाचे ठिकाण आणि त्या संदर्भातील निर्णय केवळ आशिया क्रिकेट परिषद घेऊ शकते, असा दावा वसीम खान यांनी केला आहे.