आरोग्य मंत्रालयाकडून नवे दिशानिर्देश : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांहून अधिक झाल्याने टाळेबंदी 31 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु सरकारने काही अटींसह टाळेबंदी शिथिल केली आहे. खासगी आणि शासकीय कार्यालये सुरू करणे, ऑटो, कॅब आणि बससेवा सुरू करणे, सर्वप्रकारची दुकाने खुली करण्यासह आर्थिक व्यवहारांना सूट देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने कार्यालये आणि सर्वप्रकारच्या कार्यस्थळांमध्ये कसे काम होईल?, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी?, काय करावे आणि काय करू नये यासंबंधीचे नवे दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत.
कार्यालयांमधील खबरदारीचे उपाय
? कार्यालयीन कर्मचाऱयांमध्ये एक मीटरचे अंतर राखणे अनिवार्य असेल.
? फेस कव्हर किंवा मास्क परिधान करणे प्रत्येकासाठी अनिवार्य.
? हात अस्वच्छ आढळल्यास 40-60 सेकंदापर्यंत हात धुवावे लागतील.
? किमान 20 सेकंदांपर्यंत सॅनिटायजर्सचा वापर करावा लागणार आहे.
? खोकताना-शिंकताना संबंधिताला शिष्टाचाराचे पालन करावे लागेल.
? सर्वांना स्वतःच्या प्रकृतीची स्वतः देखरेख करावी लागणार आहे.
? संशयित रुग्ण आढळल्यास स्थानिक प्रशासनाकडून सल्ला घ्यावा.
? सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्वरित कार्यालयाला माहिती द्या.
? कंटेन्मेंट झोनमधील कर्मचाऱयाला होम क्वारेंटाईनची अनुमती द्यावी लागेल.
? लक्षणे दिसणाऱया कर्मचाऱयाला आयसोलेट करत हेल्पलाईनवर माहिती द्यावी.
? जिल्हा पातळीवरील पथक स्थितीचा आढावा घेत जोखीम ठरविणार आहे.
? संपर्कातील व्यक्ती आणि संस्थेला डिसइन्फेक्ट करण्याचा सल्ला दिला जाईल.
? संशयितात सौम्य लक्षणे आढळल्यासही त्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवावे.
? रॅपिड रिस्पॉन्स टीम रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणार आहे.
? रुग्णाच्या संपर्कातील लोकांची संख्या अधिक असल्यास क्लस्टरची शंका
? संपर्कातील लोकांचे रिस्क असेसमेंट होणार, आयसोलेट किंवा क्वारेंटाईन.
? सर्वाधिक जोखीम असलेल्यांना 14 दिवसांचे क्वारेंटाईन सक्तीचे.
? जोखीम नसलेल्यांना कामकाज सुरू ठेवता येणार, देखरेख ठेवली जाणार.
कार्यालयांमधील व्यवस्था
?1 किंवा 2 रुग्ण आढळल्यास संबंधित परिसर डिसइन्फेक्ट केला जाणार.
?पूर्ण कार्यालय बंद करण्याची गरज नाही, डिसइन्फेक्टनंतर पुन्हा काम सुरू.?
अधिक रुग्ण आढळल्यास पूर्ण इमारत 48 तासांसाठी बंद करावी लागणार.
?संबंधित इमारत बारकाईने डिसइन्फेक्ट करावी लागणार आहे.
?जोखीमरहित प्रमाणपत्र मिळेपर्यंत कर्मचाऱयांनी घरातून काम करावे.लागणार.