ऑनलाईन टीम / नवी मुंबई
त्रिपुरा येथे न पाडलेल्या मशीदीच्या निमित्ताने संपुर्ण आसाम राज्यात दंगली घडल्या होत्या. याचे पडसाद महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव या ठीकाणी ही उमटले आहेत. मशीद पडली नसताना ही याचे खोटे फोटो व्हायरल झाले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असलं तरी याद मुद्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापु लागले आहे. यामुद्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्रिपुरातल्या कथित घटनेवर राज्यात मोर्चे, बंद करणं यामागे भाजपा असल्याचा आरोप केला आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
ते म्हणाले की “त्रिपुरातील घटनेचे पडसाद म्हणून मालेगावात दंगली होण्यापेक्षा दुर्दैवी संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य आहे. मला खूप कीव येते, वाईट वाटतं. राजकारणासाठी आपण किती लाचार झालो आहोत. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत पाहिजे होते. त्यांनी एक थोबाडीत दिली असती” यामुळे शिवसेना पक्ष म्हणुन नेमकी काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी इंदिरा गांधी यांचे उदाहरण देत, १० लाख लोकांचे जेलमध्ये घातलं हे सामान्य माणसाला कळलं. त्याने इंदिरा गांधींना घरी पाठवलं. त्यामुळे कुणीही मिजास बाळगण्याचं कारण नाही, की आम्हाला कोण हात लावतंय. भल्याभल्यांना जनता घरी पाठवते”, असं देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.