ऑनलाईन टीम / नवी मुंबई
राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा भाजपला शह देण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी रणनीती आखली आहे. ममता सद्या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून राष्ट्रीय स्तरावर आघाडी करण्याचे मनसुबे आखत असल्याचे अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ममता यांनी आपल्या दौऱ्याची रुपरेषा त्यादृष्टीनेच आखली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ट नेत्यांच्या भेटी – गाठी घेतल्या आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय आघाडीसाठी जे जे पक्ष सोबत येतील त्यांच्याशी युती करत आघाडीचा विचार करणार असल्याचे ही त्या यावेळी म्हणाल्या.
ममता बॅनर्जींनी मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ही विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. या चर्चेमध्ये बोलताना भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीचे त्यांनी संकेत दिले आहेत. वाय. बी. सेंटरमध्ये ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या चर्चेमध्ये स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता. या चर्चेदरम्यान राजकीय मुद्द्यांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला सांगतानाच भाजपाविरोधी आघाडीचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिले.