ऑनलाईन टीम / मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी पुन्हा संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या काळात होत असणारे घरगुती हिंसाचार आणि मानसिक संतुलनामुळे वाढणाऱ्या हिंसाचारांच्या घटनांवर प्रकाळ टाकला. राज्यात हे कधीही खपवून घेतले जाणार नाही, हे सांगतानाच ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला तीन हेल्पलाईन नंबर दिले आहेत.
घरगुती हिंसाचारासाठी हेल्पलाईन नंबर १००
घरगुती हिंसाचाराच्या घटना घडू नये आणि अशा घटना घडल्यास महिलांना तक्रार करता यावी म्हणून राज्य सरकारने एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. महिलांना घरगुती हिंसाचाराची तक्रार करायची असल्यास १०० नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
समुपदेशनासाठी १८०० १२० ८२००५० वर संपर्क साधा
राज्यात नागरिकांना लॉकडाऊनमुळे घरातच राहावे लागत आहे. अशावेळी मानसिक अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. शिवाय एकटेपणा आणि बैचनी वाढली तर समुपदेशनाची गरज आहे. त्यासाठी मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या १८०० १२० ८२००५० क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच आदिवासी विकास विभागाकडून तसेच प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्ला यांच्या १८०० १०२ ४०४० क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलंय.