ऑनलाईन टीम/तरुण भारत
“जर मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यंदा देखील उत्तर प्रदेश विधानसबभा निवडणूक जिंकले तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील.” असं विधान समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार पुन्हा आले तर काय होईल? असा प्रश्न अखिलेश यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, “पुन्हा एकदा जर योगींनी निवडणूक जिंकली तर ते पंतप्रधान पदाचे दावेदार होतील. आतापासूनच डबल इंजिनची टक्कर होते आहे, भाजपवाल्याने याचा विचार करावा.” पंचायत आजतक या कार्यक्रमात अखिलेश यादव बोलत होते.