बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन चिंतेत आहे. गुरुवारी राज्यात ४ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. सरकार कोरोना परिस्थितीवर मिळविण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. जर राज्य सरकार कोरोना विषाणूच्या संसर्गापासून राज्यातील लोकांना संरक्षण देऊ शकत नसेल तर अशा सरकारने त्वरित राजीनामा द्यावा. राज्य सरकार सक्षम प्रशासन देऊ शकत नसेल तर विधानसभा विसर्जित करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. असे कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी म्हंटले आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्रीरामुलु यांनी एक दिवसांपूर्वी चित्रदुर्गा येथे केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना डी. के. शिवकुमार यांनी जर सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री केवळ देवच जनतेचे रक्षण करू शकतात असे बेजबाबदारपणे सांगतात, तेव्हा हे स्पष्ट होते की सरकारची या सर्व परिस्थितीशी संघर्ष करण्याची क्षमता नाही. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांचे विधान सहजपणे घेतले जाऊ शकत नाही. हे विधान सरकारचे विधान मानले जाईल. तसेच जर देव जनतेचे रक्षण करायचे असेल तर भाजपाला काय साध्य करायचे आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. हे सरकार प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गासारखी परिस्थिती लक्षात घेऊन पक्षीय राजकारण वगळता विरोधकांनी सरकारला पाठिंबा दर्शविला आहे, परंतु हे सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत असल्याची टीका काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केली आहे.