ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या भविष्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शाहरुख खानला मोलाचा सल्ला दिला आहे. आर्यनचे भविष्य वाचवायचे असेल तर त्याला तुरुंगाऐवजी 1 ते 2 महिने पुनर्वसन केंद्रात ठेवायला हवं. तिथे त्याचे व्यसन सुटेल, असे आठवले यांनी म्हटले आहे.
आठवले म्हणाले, आर्यन खानला एनसीबीने अटक करुन तीन आठवडे उलटले. क्रूझवर टाकलेल्या छाप्यात एनसीबीला आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मिळाले नसल्याचा दावा आर्यन खानकडून न्यायालयात करण्यात आला आहे. किमान 5 ते 6 वेळा जामिनासाठी त्याने अर्ज केला. मात्र तो फेटाळण्यात आला. यावरुन आर्यनची अटक बेकायदेशीर म्हणता येणार नाही. तरुण वयात अंमली पदार्थांचे सेवन चांगले नाही. आर्यनचे भविष्य वाचवायचे असेल तर त्याला शाहरुखने मंत्रालयाशी संबंधित पुनर्वसन केंद्रात एक-दोन महिने ठेवायला हवं, असेही आठवले म्हणाले.