ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासह विविध प्रश्नांची सोडवणूक करावी
सांगरुळ / वार्ताहर
गावाला नियमीत व पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नाही, गावातील कचरा उठाव होत नसल्याने डेंग्यू साथ पसरत आहे. याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात कराव्यात . तसेच आठ दिवसांच्या आत ग्रामसभा घ्यावी. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह अनेक प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करावी यासाठी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच सुशांत नाळे यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांचा विचार न केल्यास ग्रामपंचायतीस टाळे ठोकण्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला.
गेल्या काही दिवसांपासून सांगरुळमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याबरोबरच पाणीटंचाई आहे. याबाबत ग्रामस्थांतून वारंवार ग्रामपंचायतीकडे केली जात आहे ..पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे सोईस्कर दुर्लक्ष करत आहे.गावच्या पेयजल योजनेमुळे चार वर्षांपूर्वी चौथ्या मजल्यावर पाणी जात होते.पण सध्या पहिल्या मजल्यावर पाणी जात नाही.ग्रामपंचायत पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा न करता कमी दाबाने पाणी पुरवठा करत आहे.तसेच गावाला होणारा पिण्याचा पाणी पुरवठा फिल्टर न करताच होत असल्याने लोकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला चालला आहे.
यापूर्वी दोन आक्टोबर २०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.कोरोना मुळे रेकॉर्ड अपूर्ण असल्याचे सांगत आठ दिवसांत परत ग्रामसभा घेऊ असे आश्वासन सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले होते.या गोष्टीला दोन महिने उलटले तरी सभा घेतलेली नाही.आठ दिवसात ग्रामसभा घेतली नाही तर ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा बदाम खाडे यांनी दिला.यावेळी उपस्थित उपसरपंच सुशांत नाळे यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारून सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.
यावेळी माजी उपसरपंच बाळासो यादव अरुण खाडे, बदाम खाडे, कमलाकर खाडे, बाळासो खाडे, सुभाष सुतार, दिलीप खाडे, विवेक खाडे, रविंद्र खाडे, उत्तम कासोटे, उदय खाडे ,मारुती खाडे, विलास खाडे, संभाजी साळोखे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावाला नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्न करत आहे . पण एकाच आठवड्यात दोन्ही पाणीपुरवठा यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाण्याची कमतरता जाणवत आहे . याबाबतची सूचना ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना दिली असून सध्या पाणी पुरवठा सुरू केला आहे. तसेच उर्वरित काम पूर्ण करून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगितले .शासनाच्या नियमानुसार यापूर्वी ग्रामसभा घेतले आहेत या पुढेही त्या घेतल्या जातील – सदाशिव खाडे – लोकनियुक्त सरपंच सांगरुळ