ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता लॉक डाऊनचा कालावधी आता 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात कोणी गैरवर्तन केल्यास त्यांची खैर नाही. असे म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
अनिल देशमुख म्हणाले, काही विकृत प्रवृत्तीचे लोक लॉक डाऊनचा गैरफायदा घेत महिलांवर अत्याचार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या काळात महिला अत्याचाराच्या अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अधिक कठोर कारवाई केली जाईल.
सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही महिलांचा छळ केल्यास पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासन अशा पीडित स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे ही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.