सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी परिसरातील विविध तलावांचा विकास करण्यात आला आहे. मात्र, बसथांब्याच्या परिसरात 2 एकर 21 गुंठे जागेत असलेल्या तलावाच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच पावले उचलण्यात आली नव्हती. याबाबत तक्रारी करण्यात आल्याने तलाव परिसरात ‘सरकारी तलाव’ असा फलक लावून तलाव वाचविण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. मात्र, तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्याच्यादृष्टीने कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
कणबर्गी परिसरात असलेल्या विविध तलावांचा उपयोग शेतकऱयांना होत आहे. गावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तलावाची स्वच्छता करून संपूर्ण तलावाचा विकास करण्यात आला आहे. बसथांबा परिसरात नव्याने कॉलनी होत असून जवळच मोठा तलाव आहे. दोन एकर 21 गुंठे जागेत तलाव असून पावसाळय़ात भरतो. डिसेंबर अखेरपर्यंत यामध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे परिसरातील शेतकरी तलावातील पाण्याचा वापर शेतीकरिता करीत असतात. पण नव्याने निर्माण होणाऱया वसाहतीमधील सांडपाणी तलावामध्ये सोडण्यात येत असल्याने पाणी दूषित होत आहे.
आता तलावाला सांडपाण्याच्या तलावाचे स्वरूप येत आहे. त्यामुळे शेतकऱयांना सांडपाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्मयात आले आहे. सदर सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱयांनी केली होती. सदर तलावातील पाण्याचा उपयोग शेतीकरिता व्हावा, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकऱयांनी केली होती. याची दखल प्रशासनाने घेतली असून सदर तलावाच्या जागेच्या सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाने भूमापन खात्याला पत्र पाठविले आहे. सदर तलावाच्या जागेवर ‘सरकारी तलाव’ असा फलक लावण्यात आला आहे. तलावाच्या बचावासाठी पावले उचलण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
तलावामध्ये मिसळणारे सांडपाणी रोखण्याच्यादृष्टीने कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.