समाधानकारक पाऊस होऊनही पाणी समस्या : शासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
उन्हाळय़ाला सुरुवात झाली असून पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक गावात पाणी समस्या आतापासून गंभीर बनत आहे. गत दोन वर्षात पावसाळय़ात समाधानकारक पाऊस होऊनही पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी समस्या दूर करण्यासाठी उन्हाळय़ात तलाव व जलाशयांच्या निर्मितीकडे प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून होत आहे. शिवाय ही कामे रोजगारातून करावीत, अशी मागणीही जोर धरून आहे.
एकीकडे शासन पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या योजना राबवत असते. मात्र, दुसरीकडे उन्हाळा आला की दरवषी तालुक्मयातील काही गावांत भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरवषी उन्हाळा सुरू झाला की ही परिस्थिती निर्माण होते. मात्र, याकडे नेहमीच लोकप्रतिनिधी व शासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.
उन्हाळय़ातील गंभीर पाणी टंचाई लक्षात घेऊन तलावांची खोदाई करणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे, कालवे व जलाशयांच्या निर्मितीसाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात शेती व्यवसाय केला जात असल्याने शेतीसाठी मुबलक पाण्याची गरज आहे. दिवसेंदिवस पावसाची अनिश्चितता व घटत जाणाऱया प्रमाणामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. भू-गर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी तलाव, कालवे व जलाशयांची निर्मिती करणे काळाची गरज आहे.
पाणी संकट दूर होण्यास मदत तालुक्मयातील बहुतांशी तलावांतील पाण्याच्या पातळीत घट झाली असून काही तलाव कोरडे पडले आहेत. या तलावांतील गाळ काढून खोदाई केल्यास पाणी पातळीत वाढ होऊन थोडय़ाफार प्रमाणात पाणी संकट दूर होईल. पावसाळय़ात साठवून ठेवलेल्या पाण्याचा वापर उन्हाळय़ात होत असतो. यासाठी तलाव व जलाशयांची निर्मिती करणे गरजेचे आहे. पाण्याची साठवण झाल्यास भू-गर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन हजारो एकर जमीन ओलीताखाली येण्यास मदत होणार आहे.